“हे एव्हढं सोपं आहे असं समजू नका”; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख, जयंत पाटलांचा शिंदे गटाला इशारा
-जका खान, बुलढाणा शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातील आमदारांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. जयंत पाटील यांनी ‘५० खोके’चा मुद्दाही उपस्थित केला. तसेच ज्यांना बाळासाहेबांनी मंत्री केलं, त्यांनीच त्यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं, असं पाटील म्हणाले. याच बैठकीत माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचं नाव […]
ADVERTISEMENT

-जका खान, बुलढाणा
शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातील आमदारांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. जयंत पाटील यांनी ‘५० खोके’चा मुद्दाही उपस्थित केला. तसेच ज्यांना बाळासाहेबांनी मंत्री केलं, त्यांनीच त्यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं, असं पाटील म्हणाले. याच बैठकीत माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचं नाव घेत जयंत पाटील काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी बुलढाणा, मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीला राजेंद्र शिंगणेही उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झालंय, त्यातील कुणीही सुखी आणि समाधानी नाहीये. पानवाले, टपरीवाले, स्कुटरवाले, रिक्षावाले बाळासाहेबांच्या (balasaheb Thackeray) पुण्याईने शून्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. मंत्री झाले. त्या सर्वांनी शिवसेनेकडे पाठ फिरवून शिवसेनेचा मुख्यमंत्री पाडला. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला (Uddhav thackeray ) पाडलं. त्याला खाली खेचलं. हे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या मनात घर करून राहणार आहे. हे एव्हढं सोप्प आहे, असं समजू नका”, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
शिंदे गटाने शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय नेलं टेंभी नाक्यावर; काय आहे प्रकरण?