Jitendra Awhad : “एका बाईला पुढे करून महाभारतासारखं राजकारण करण्यात आलं हे सगळं..”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माझ्या विरोधात बदनामीचं षडयंत्र रचलं गेलं. एखाद्या महिलेला पुढे करून महाभारतासारखं राजकारण माझ्याबाबतीत करण्यात आलं असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केला आहे. विनयभंगाच्या आरोपात जामीन प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

मी अटकपूर्व जामिनासाठी जाणारच नव्हतो

मला या जामिनाचा बिलकुल आनंद झालेला नाही. मी तर अटकपूर्व जामिनासाठी जाणारही नव्हतो असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. पोलिसांवर दबाव येतो आहे तो कुठून येतो आहे तुम्ही तपासा असंही जितेंद्र आव्हाड पत्रकारांना उद्देशून म्हणाले. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जर राजकारण केलं जातं. पोलीसही आम्हाला वरून दबाव असल्याचं सांगत आहेत. बायकोचं आणि मुलांचं ऐकून तसंच पक्ष कार्यकर्त्यांचं ऐकून मी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेलो नाहीतर अटक झाली असती तरी चाललं असतं असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

माझ्याविरोधात किळसवाणं राजकारण

माझ्या विरोधात किळसवाणं राजकारण करण्यात आलं आहे. त्यादिवशीचे सगळे व्हीडिओ प्रसारमाध्यमावर आहेत. तुम्ही बघा आणि ठरवा की तो विनयभंग आहे का? एखाद्या बाईला पुढे करून राजकारण केलं गेलं आहे. यात शकुनीच्या भूमिकेत कोण आहे मला माहित नाही मात्र जे काही घडलंते अत्यंतिक वाईट आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

कळवा-ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा खाडी पुलाचं उद्धघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (13 नोव्हेंबर) झालं. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.याच कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केला. भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी आव्हाड यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आव्हाडांविरुद्ध कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आव्हाड यांनी हा खोटा गुन्हा असल्याचं म्हणतं व्यतित होऊन राजीनामा देण्याची दर्शविली.

दरम्यान, याच गुन्ह्यात आव्हाडांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात हा गुन्हा राजकीय हेतून प्रेरित असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. न्यायाधीश पी. गुप्ता यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. याही प्रकरणात अॅड. विशाल भानुशाली यांनी आव्हाड यांची बाजू मांडली

ADVERTISEMENT

दरम्यान, हा गुन्हा राजकीय हेतून असल्याचा दावा आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत यांनीही केला होता. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “ज्या महिलेनं ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याकडे मोटिव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रिदा रशीद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, त्या जामीनावर आहेत.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT