छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि लोकमान्य टिळकांचा काहीच संबंध नाही-आव्हाड
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधणं लोकमान्य टिळक यांचा काहीही संबंध नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या भाषणातल्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद या ठिकाणी सभा घेतली. रविवारी झालेल्या या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी छत्रपती शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती असं म्हटलं होतं. यालाच […]
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधणं लोकमान्य टिळक यांचा काहीही संबंध नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या भाषणातल्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद या ठिकाणी सभा घेतली. रविवारी झालेल्या या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी छत्रपती शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती असं म्हटलं होतं. यालाच आता जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
“छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्रं उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होतं की लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती. निधीही जमवला होता पण त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार केला नाही.” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.