Raj Thackeray : ‘भाजपने लक्षात ठेवावं, आज भरती, उद्या ओहोटी येणारच!’

मुंबई तक

MNS Chief Raj Thackeray speech : ठाणे : भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती हे नैसर्गिक आहे. भाजपने (BJP) हे लक्षात ठेवावं, आज भरती आहे, उद्या ओहोटी येणारच. कारण हे नैसर्गिक आहे, हे कोणी थांबवू नाही शकणार, असा जाहीर इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला दिला. ते मनसेच्या (MNS) १७ वर्धापनदिन सोहळ्यात बोलत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

MNS Chief Raj Thackeray speech :

ठाणे : भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती हे नैसर्गिक आहे. भाजपने (BJP) हे लक्षात ठेवावं, आज भरती आहे, उद्या ओहोटी येणारच. कारण हे नैसर्गिक आहे, हे कोणी थांबवू नाही शकणार, असा जाहीर इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला दिला. ते मनसेच्या (MNS) १७ वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. (MNS Chief Raj Thackeray is holding a public meeting in Thane.

राज ठाकरे काय म्हणाले?

मागील १७ वर्षांच्या कामाचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. पक्ष कोणत्या परिस्थितीतून गेला, कुठल्या परिस्थितीतून जात आहे. काही जण सोडून गेले हे खरं आहे, परंतु ते एक एकटे गेले. एकत्रित गेले नाहीत. मग आपल्याला प्रश्न विचारतात लोकं राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मग मतं का नाही मिळत? मग १३ आमदार काय सोरटवर आले होते का?, असा सवाल यावेळी ठाकरेंनी विचारला.

२०१४ काय २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती. मला काय विचारता १७ वर्षात काय केलं, काँग्रेसची काय अवस्था बघा. ज्या पक्षाने या देशावर ६०-६५ वर्ष राज्य केलं, त्यांची अवस्था बघा. भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती हे नैसर्गिक आहे. भाजपनेही लक्षात ठेवावं, आता भरती आहे, ओहोटी येणार, कारण हे नैसर्गिक आहे, हे कोणी थांबवू नाही शकणार, असं राज ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp