Ajit Pawar BJP: ‘अनेक आमदारांनी सांगितलं तिथे आमच्या सह्या घेतल्या…’, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

After Ajit Pawar was sworn in as Deputy Chief Minister, NCP President Sharad Pawar has made a big secret explosion by holding a press conference.
After Ajit Pawar was sworn in as Deputy Chief Minister, NCP President Sharad Pawar has made a big secret explosion by holding a press conference.
social share
google news

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. या शपथविधीनंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्रकार परिषद घेऊन असा दावा केला की, त्यांच्यासोबत पक्षातील बहुसंख्य आमदार आहे. मात्र, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट केला. (many mla said that our signatures were taken ncp chief sharad pawar big secret explosion after ajit pawar oath with bjp shiv sena maharashtra politics update today)

‘माझं स्वच्छ मत असं आहे की, पक्षातले काही सदस्य विशेषत: विधीमंडळातील यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली यासंबंधीचं चित्र आणखी 2-3 दिवसात लोकांच्या समोर येईल. त्याचं कारण की, ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे.’ असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

2019 मध्येही जेव्हा अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी पार पडला होता तेव्हा देखील अशाच पद्धतीचा दावा हा राष्ट्रवादीच्या आमदारांकडून करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा तसाच दावा करण्यात येत आहे की, आमदारांना निमंत्रित करून नंतर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यामुळे अजित पवारांच्या या शपथविधीबाबत पुन्हा एकदा गूढ निर्माण झालं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले?

‘…म्हणून मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे..’

‘दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल होतं. त्यामध्ये त्यांनी दोन गोष्ट सांगितल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सरकारी बँकेचा उल्लेख केला त्यासोबत सिंचनाबाबत जी तक्रार होती त्याविषयी उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहेत. असा आरोप केला. मला आनंद आहे की, आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ त्या संबंधीचे त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. त्या सर्व आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा पंतप्रधानांचा आभारी आहे.’

‘अनेक आमदार म्हणाले, आम्हाला बोलावून आमच्या सह्या घेतल्या…’

‘आमच्या सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. सहा तारखेला मी महाराष्ट्रातील पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. आणि त्या बैठकीत काही प्रश्नांचा विचार करणार होतो. पण प्रश्न उपस्थित हे केले गेले होते त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत अशाप्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत…’, अजितदादांकडून ‘त्या’ कृतीचं समर्थन

‘माझं स्वच्छ मत असं आहे की, पक्षातले काही सदस्य विशेषत: विधीमंडळातील यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली यासंबंधीचं चित्र आणखी 2-3 दिवसात लोकांच्या समोर येईल. त्याचं कारण की, ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे. पण त्याबाबतीत मी आताच काही बोलू इच्छित नाही. पण त्याचं स्वच्छ चित्र माझ्या इतकंच जनतेसमोर त्यांनी मांडण्याची आवश्यकता आहे. ते जर त्यांनी मांडलं तर त्याबद्दल माझा विश्वास बसेल. मांडलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असं निष्कर्ष मी काढेल.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

‘तेव्हा तर मला 52 आमदार सोडून गेले होते…’

‘आता प्रश्न राहिला पक्षाच्या भवितव्यविषयीचा.. हा आजचा प्रकार इतरांना नवीन असला तरी मला हा नवीन नाही. मला आठवतंय की, 1980 साली निवडणुकीच्या नंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो.. त्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले होते आणि एक महिन्यानंतर त्या 58 पैकी 6 सोडले तर सगळे पक्ष सोडून गेले होते.’

‘सगळे पक्ष सोडून गेले मी त्या 58 चा नेता होतो.. विरोधी पक्ष नेता.. त्याऐवजी पाचच.. मी एक सोडून पाचच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना बरोबर घेऊन मी पुन्हा पक्ष बांधायला महाराष्ट्रात फिरलो.’

हे ही वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांनी घेतली शपथ, शरद पवारांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

‘माझा उद्देश त्यात होता की, पुन्हा पक्षाची बांधणी करायची. पाच वर्षाने जी निवडणूक झाली त्यात दोन गोष्टी दिसल्या.. एक म्हणजे आमची संख्या 69 वर गेली. म्हणजे संख्या वाढली.. पाचचा नेता असताना सुद्धा वाढली. नुसती वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी तीन ते चार जर सोडले तर सगळे पराभूत झाले. त्यामुळे 1980 जे चित्र दिसलं तेच चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसं उभं करता येईल हा माझा एक कलमी कार्यक्रम राहील.’

‘माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. तुम्हाला आठवत असेल चार वर्षापूर्वी जी निवडणूक झाली तेव्हा देखील असंच चित्र होतं. पण संबंध महाराष्ट्रामध्ये जिथे जाता येईल त्या ठिकाणी जाणं आणि भूमिका मांडणं हे काम केलं. त्याचा परिणाम.. आमची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली. आम्हाला यश त्या ठिकाणी आलं. संयुक्त सरकार त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलं. आज पुन्हा ती स्थिती आहे.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT