भोंग्याचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू द्या ! राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद येथील सभेत केलेल्या प्रक्षोभक विधानाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला राज ठाकरे यांच्यावर लावण्यात आलेली कलम जामीनपात्र आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडत संपूर्ण देशभरातील हिंदू नागरिकांना आवाहन केलेलं आहे.

सोशल मीडियावरुन केलेल्या आवाहनात राज ठाकरेंनी सावध भूमिका घेत मनसे कार्यकर्त्यांना थेट आदेश देण्याऐवजी हिंदू नागरिकांना भोंग्यांविरुद्ध भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. 4 मे रोजी जिथे यांचे भोंगे अजान आणि बांग देतील तिकडे आपण भोंग्यावर हनुमान चालीसा लावावी. भोंग्याचा काय त्रास होतो हे त्यांनाही समजू द्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी तीन पानी पत्रात आपली जाहीर भूमिका मांडून हिंदू जनतेला आवाहन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या डेसीबल बद्दल घालून दिलेल्या नियमांचा दाखला देत राज ठाकरे यांनी मनसेने उचललेला हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. बहुतांश मशिदी अनधिकृत असताना सरकार त्यावर भोंगे लावायला परवानगी का आणि कशी देते? भोंग्यांमुळे होणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास हा देशातील सर्वधर्मीयांना होतो. ही बाब प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं, वाहतूक कोंडी करणं हे कोणत्या धर्मात बसतं असा सवाल राज ठाकरेंनी आपल्या पत्रात विचारला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यापुढे बोलताना राज ठाकरेंनी जर या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल या भूमिकेचा राज यांनी पुनरुच्चार केला. आम्हाला देशात शांतता हवी आहे, दंगली आम्हालाही नको आहेत. परंतू आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं.

राज ठाकरेंच्या भाषणातलं ‘हेच ते’ वक्तव्य ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा झाला दाखल

ADVERTISEMENT

या पत्रात राज ठाकरेंनी सर्वसामान्य हिंदू जनतेला या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. मशिदीवरील बांग सुरु झाली की पोलिसांच्या 100 नंबरवर फोन करुन त्याची तक्रार द्या…रोज द्या, सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि तशी पत्र स्थानिक पोलीस ठाण्यांना द्यावी, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. याचसोबत सामाजिक भान राखत ज्या मशिदींनी भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचं मी स्वागत करतो आणि हिंदू बांधवांनी त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असंही आवाहन राज ठाकरेंनी केली आहे.

ADVERTISEMENT

“भावावर राजद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करणार? हा प्रश्न उद्धव ठाकरेंना पडलाय का?”

गुढीपाडव्याची सभा, ठाण्याची उत्तर सभा आणि औरंगाबादच्या सभेत लाऊडस्पीकरवरुन कार्यकर्त्यांना थेट आदेश देणाऱ्या राज ठाकरेंनी आपल्या तीन पानी पत्रात सावध भूमिका घेत जनतेला या मोहीमेत सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज यांच्या भूमिकेचे पडसाद आगामी काळात राज्याच्या राजकारणात कसे उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते! प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

    follow whatsapp

    ADVERTISEMENT