राहुल गांधी यांचं फडणवीस-शेवाळे यांना प्रत्युत्तर : वीर सावरकर यांचं ‘ते’ पत्र आणलं समोर
अकोला : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान केलेल्या एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर हे कसे माफीवीर होते, इंग्रजांकडून भत्ता घेत होते हे आपल्या भाषणात सांगितलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधींविरोधात टीका करण्यात येत आहे. तसंच त्यांच्याविरोधात जोडो मारो […]
ADVERTISEMENT

अकोला : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान केलेल्या एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर हे कसे माफीवीर होते, इंग्रजांकडून भत्ता घेत होते हे आपल्या भाषणात सांगितलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधींविरोधात टीका करण्यात येत आहे. तसंच त्यांच्याविरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. इतकंच नाही तर खासदार राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रा थांबविण्याचीही मागणी केली.
याच सगळ्या वादावर गुरुवारी राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस-शेवाळे यांना उत्तर दिलं. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सावरकर यांनी 30 मार्च 1920 रोजी इंग्रजांना लिहिलेलं एक पत्र दाखवून त्यातील शेवटची ओळ वाचून दाखविली. यात I beg to remain sir, your most obedient servant अशी ही ओळ होती.
या ओळीचा हिंदी अर्थ “सर मै आपका नोकर रहना चाहता हुँ!” असा होत असल्याचही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सावरकर यांनी इंग्रजांची मदत केली होती हे मी स्पष्टपणे सांगू शकतो. हे पत्र फडणवीस यांना पाहायचं असेल तरी ते बघू शकतात, असंही राहुल गांधी म्हणाले.