मुख्यमंत्री व्हावं म्हणून उद्धव ठाकरेंवर रश्मी ठाकरे ओरडल्या?; रामदास कदमांनी काय म्हटलंय?

मुंबई तक

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपासून दूर गेलेले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या रामदास कदम यांनी दापोलीतल्या सभेत मातोश्रीवर हल्ला चढवला. आदित्य ठाकरेंपासून ते भास्कर जाधवांपर्यंत सर्वांवर रामदास कदमांनी पलटवार केला. २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदाबद्दल झालेल्या घटनाक्रमांबद्दल रामदास कदमांनी काही दावे केले. यात रश्मी ठाकरेंचा नामोल्लेख टाळत कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिव संवाद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपासून दूर गेलेले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या रामदास कदम यांनी दापोलीतल्या सभेत मातोश्रीवर हल्ला चढवला. आदित्य ठाकरेंपासून ते भास्कर जाधवांपर्यंत सर्वांवर रामदास कदमांनी पलटवार केला. २०१९ मध्ये मुख्यमंत्री पदाबद्दल झालेल्या घटनाक्रमांबद्दल रामदास कदमांनी काही दावे केले. यात रश्मी ठाकरेंचा नामोल्लेख टाळत कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

शिव संवाद यात्रेला योगेश कदमांनी दापोलीत सभा घेऊन प्रत्युत्तर दिलं. याच सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदावरून गंभीर आरोप केलेत. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असं सांगितलं आणि नंतर एका रात्रीत काय झालं? असा सवालही केला.

याच सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचं नाव न घेता स्फोटक विधान केलंय. पत्नीच्या दबावामुळे मुख्यमंत्री झाले, कारण त्यांच्या पत्नीला वर्षा बंगल्यावर जायचं होतं, असा उल्लेख रामदास कदमांनी केलाय.

एकनाथ शिंदेंवर टीका करताना खासदार विनायक राऊतांचा तोल सुटला, म्हणाले…

हे वाचलं का?

    follow whatsapp