रत्नागिरीत राजन साळवींच्या गडाला सुरुंग; CM शिंदे एक नगरपंचायत ताब्यात घेऊनच परतले!

मुंबई तक

रत्नागिरी : एकहाती सत्ता असलेल्या लांजा नगरपंचायतीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला आणि स्थानिक आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे. इथले ठाकरे गटाचे नगराध्यक्ष, ५ नगरसेवकांनी आणि २ अपक्ष नगरसेवकांनी रत्नागिरीतील जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे लांजा नगरपंचायतीवरही शिवसेनेचे एकहाती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रत्नागिरी : एकहाती सत्ता असलेल्या लांजा नगरपंचायतीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला आणि स्थानिक आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे. इथले ठाकरे गटाचे नगराध्यक्ष, ५ नगरसेवकांनी आणि २ अपक्ष नगरसेवकांनी रत्नागिरीतील जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे लांजा नगरपंचायतीवरही शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होतं. जानेवारी २०२० मध्ये इथे नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर बाईत निवडून आले होते. तर १७ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे ९, भाजपचे ३, काॅंग्रेसचे २ आणि ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती.

पण लांजामध्ये आमदार राजन साळवी यांना मानणारे जसे नगरसेवक आहेत, तसेच मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांना मानणारे नगरसेवक आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून लांजामध्ये शिवसेनेत मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

अखेर शुक्रवारी रत्नागिरी येथे पार पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेविका समृद्धी गुरव, वंदना काडगाळकर, सोनाली गुरव, सचिन डोंगरकर, प्रसाद डोर्ले यांच्यासह अपक्ष नगरसेविका मधुरा बापेरकर, दूर्वा भाईशेटे या सात नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp