Ravindra Chavan : “एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाजपने दिल्लीत केले प्लानिंग, फडणवीस होते…”

मुंबई तक

चव्हाण यांच्या गौप्यस्फोटाने शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात होता यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात असून, यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.

ADVERTISEMENT

Ravindra chavan, who is minister Eknath Shinde's cabinet revealed that Bjp tried three times to revolt in shiv sena.
Ravindra chavan, who is minister Eknath Shinde's cabinet revealed that Bjp tried three times to revolt in shiv sena.
social share
google news

Eknath shinde Revolt big : ‘दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचा तीन वेळा प्रयत्न केले. 2019 मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदार यांना एकत्र करून उठाव करण्याचे नियोजनही झाले होते, मात्र तांत्रिक अडथळा आल्याने तो प्रयत्न फसला. अखेर 2022 मध्ये जूनचा महिना ठरला”, असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या गौप्यस्फोटाने शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात होता यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात असून, यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. (Bjp Minister Ravindra chavan big revelation about eknath shinde revolt)

‘दैनिक लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई ते सूरत आणि सूरत ते गुवाहाटी या सगळ्या प्रवासदरम्यान घडलेल्या पडद्यामागील घटनांचा उलगडा केला आहे.

मोबाईल काढून घेतले, टीव्हीही पाहू दिला नाही

रवींद्र चव्हाण यांनी वर्षभरापूर्वी घडलेल्या या राजकीय बंडाबद्दल काही गुपित उघड केली. ते म्हणाले, “सूरतला गेल्यावर आमदारांकडचे मोबाईल काढून घेतले होते. त्यांना टीव्ही सुद्धा बघू दिला नाही. गुवाहाटीला पोहोचल्यावरच आमदारांना टीव्ही बघायची परवानगी दिली. घरच्यांसोबत संपर्क करू दिला. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये छोटी चूक झाली असती, तरी हे ऑपरेशन सपशेल अपयशी ठरले असते. देशभर भाजपची नाचक्की झाली असती”, असा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला.

हेही वाचा >> सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री, ठाकरे-पवार डीलमुळे शिवसेना फुटली?

शिंदेंच्या बंडाचं प्लानिंग दिल्लीतील नेत्यांचं

या बंडाबद्दल आणखी माहिती देताना रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे की, “दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात अशा पद्धतीने ऑपरेशन लोटसचे तीन वेळा प्रयत्न केले. 2019 मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदार यांना एकत्र करून बंड करण्याचे नियोजन झाले होते. तांत्रिक अडथळा आला आणि तो प्रयत्न फसला. त्यानंतर कोविड आला. 2021 मध्येही प्रयत्न केला, पण वरिष्ठांनी परवानगी न दिल्याने रद्द केलं. 2022 मध्ये जून महिना ठरला आणि नियोजनही यशस्वी झाले. या सगळ्याचा अनुभव अविस्मरणीय असून, ते सगळे सांगणे अशक्य आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp