‘न्यायव्यवस्थेवर दबाव…’, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाआधी संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay raut reaction on maharashtra political dispute there is no pressure on the judiciary
sanjay raut reaction on maharashtra political dispute there is no pressure on the judiciary
social share
google news

Sanjay raut reaction on maharashtra political dispute :महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्ट 11 मे रोजी निकाल देणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. या निकालावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut)  प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा फैसला अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आम्ही आशावादी आहोत. कायद्याचा विजयी होईल आणि उद्या आम्हाला न्याय मिळेल,असे संजय राऊत म्हणाले आहेत. (sanjay raut reaction on maharashtra political dispute there is no pressure on the judiciary then justice served)

पाकिस्तान आज जळतंय, कारण ते सविधानानुसार चाललं नाही.विरोधकांर सुडबुद्धीने कारवाया सुरू आहेत. सरकारे पाडली जातायत, सरकारे आणली जातायत. न्याय व्यवस्था विकली जातेय, हे चित्र देशामध्ये असू नये म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निकाल अत्यंत महत्वाचा असल्याचे राऊत म्हणाले आहेत. आम्ही असं अजिबात म्हणत नाही, की निकाल आमच्या बाजूने लागेल. न्यायव्यवस्थेवर कोणाचाही दबाव नसेल तर उद्या न्याय मिळेल.आणि सविधानाचा, कायद्याचा विजयी होईल.आम्ही आशावादी आहोत.

हे ही वाचा : ठाकरे-शिंदेंच्या लढाईचा उद्या ‘सुप्रीम’ फैसला!

राहूल नार्वेकर कायदेपंडीत

जर कुणी म्हणत (राहुल नार्वेकर) असेल सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत आम्हीच…तर त्यांनी काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न केलाय,असा आरोप राऊत यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला. याआधी देखील विधानसभा अध्यक्ष पदावर कायद्याची माहिती असलेली एक व्यक्ती बसली होती. त्याने एक निर्णय दिलाच आहे, हे विसरता कामा नये, असे देखील राऊत म्हणाले.मला अजिबात कायद्याचे ज्ञान नाही ते राहूल नार्वेकर कायदेपंडीत आहेत,अशी टीका देखील राऊत (Sanjay raut)  यांनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विधानसभा अध्यक्ष जर म्हणत असतील निर्णयाचा अधिकार आपल्याला आहेत. तर ते उद्या सर्वोच्च न्यायालय ठरवेल. पण मला अजूनही खात्री आहे, न्यायालय स्वतंत्र आहे.या देशात लोकशाहीचा न्यायव्यवस्थेचा विजय होईल, असे देखील राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ..तर यांची आमदारकी जाणार, CM शिंदेसह ‘ते’ 16 आमदार कोण?

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मी निकालावर काहीच बोलत नाही आहे. आम्हाला न्याय देवतेवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. जर अशी गद्दारी आपल्या महाराष्ट्रात घडलीय ती दुर्लक्ष करत गेलो तर उद्या राजकीय अस्थिरता निर्माण होईल,असे देखील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले. तसेच राहुल नार्वेकर यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. ते घटनाबाह्य अध्यक्ष बसले आहेत का? असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT