राज्यसभा निवडणूक: फडणवीसांनी दिवसभर एकही प्रतिक्रिया दिली नाही, मध्यरात्री ‘डाव’ पलटला अन् पहाटे..

मुंबई तक

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत भाजपने अतिशय अनपेक्षितरित्या आपला तिसरा उमेदवार देखील निवडून आणण्याचा चमत्कार घडवला आहे. महाविकास आघाडीचं पुरेसं संख्याबळ असताना देखील अनेक मतं फोडून भाजपने धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणलं. तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. या सगळ्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस असल्याचं आता समोर आलं आहे.राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर देवेंद्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत भाजपने अतिशय अनपेक्षितरित्या आपला तिसरा उमेदवार देखील निवडून आणण्याचा चमत्कार घडवला आहे. महाविकास आघाडीचं पुरेसं संख्याबळ असताना देखील अनेक मतं फोडून भाजपने धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणलं. तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. या सगळ्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस असल्याचं आता समोर आलं आहे.राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर येऊन आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली.

खरं तर दोन दिवसांपासून महाविकास आघाडीने दावा केला होता की, त्यांचे चार उमेदवार निवडणूक जिंकून येतील. तर दुसरीकडे भाजपकडून आज दिवसभरात फार कोणी प्रतिक्रिया देत नव्हतं स्वत: फडणवीसांनी दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर रात्रीत सगळा डाव पलटला अन् भाजपच्या दणदणीत विजयानंतर फडणवीस हे पहाटे-पहाटे मीडियासमोर आले आणि मग ते भरभरुन बोलले.

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

‘आमच्या सगळ्यांकरिता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की भाजपचे तीनही उमेदवार याठिकाणी निवडून आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो विजय आहे हा विजय मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या लढवय्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो.’

हे वाचलं का?

    follow whatsapp