एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्यातील तीन नेत्यांना मिळणार संधी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इम्तियाज मुजावर, सातारा

राज्यात भाजप-शिंदे गट युतीचं सरकार अस्तित्वात आलं आहे. आता मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता असून, सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. शिंदे गटातून माजी मंत्री शंभूराज देसाईंना लॉटरी लागणार असल्याचं म्हटलं जातंय. तर भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे दावेदार असल्याची चर्चा रंगलीये.

गोरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास माण तालुक्याला प्रथमच ‘मान’ मिळू शकतो. राज्याच्या राजकारणात सातारा (Satara) जिल्ह्याचे नाव अधोरेखित आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याने मुख्यमंत्रिपदाचा चौकार ठोकला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जिल्ह्याची मंत्रिपदाची कमान सतत चढती राहिली. गेल्या काही वर्षांचा विचार करता जिल्ह्यात तरुण नेते समोर आले. त्यांच्याकडे नेतृत्व तसेच कर्तृत्व असल्याचेही दिसले. यामुळे जिल्ह्यातील नेत्यांचा दबदबा विधिमंडळातही दिसून आला.

जयकुमार गोरेंसारखे आमदार अनेक विषयांवर आवाज उठवत असतात. जिल्ह्याचा मागील चार वर्षांचा विचार करता राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळताना दिसत आहे. काँग्रेसलाही गळती लागली असून, यातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी कमळ हातात घेतले आहे.

ADVERTISEMENT

सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत, तर भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन व काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपची रणनीती पाहता पक्षाला जिल्ह्याचा ताबा घ्यायचा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेकांना पक्षात घेऊन ताकद देण्याचे काम करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे हे काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेले. त्यापूर्वी डॉ. अतुल भोसले यांनीही पक्षांतर केलेलं. सद्यस्थितीचा विचार करता जिल्ह्यात भाजपच राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकते, असे चित्र आहे. त्यातच शिवसेनेचा गट बरोबर आल्यानं भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

२०१९ मध्ये वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांनी कमळ हाती घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमारांना आमदार करा, मंत्रिपद मी देतो, असे लोकांना आश्वस्त केलेले.

त्याचबरोबर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही मंत्रिपदाचे दावेदार आहेत. फडणवीस यांनीही त्यांना शब्द दिल्याचे सांगण्यात येते. यामुळे युती सरकार पुन्हा आल्याने भाजपमधून हे दोघे मंत्री होऊ शकतात.

पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते प्रथम गेले होते. त्यामुळे देसाई यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळू शकते, अशी शक्यता अधिक आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT