‘मेंढरं’ म्हणत शिवसेनेनं शिंदे गटाला ‘५० खोके’वरून डिवचलं; नितीन गडकरींबद्दल ‘सामना’तून कुणाकडे बोट?
दिल्लीच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडी, बिहारमध्ये सीबीआयची छापेमारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय समितीतून वगळण्यात आल्याबद्दल शिवसेनेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी-अमित शाह यांचा नामोल्लेख न करता टीकेचे बाण डागले आहेत. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मेंढरं असा उल्लेख करत पुन्हा एकदा ‘५० खोके’वरून डिवचलं आहे. ऑपरेशन लोटस […]
ADVERTISEMENT

दिल्लीच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडी, बिहारमध्ये सीबीआयची छापेमारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय समितीतून वगळण्यात आल्याबद्दल शिवसेनेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी-अमित शाह यांचा नामोल्लेख न करता टीकेचे बाण डागले आहेत. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मेंढरं असा उल्लेख करत पुन्हा एकदा ‘५० खोके’वरून डिवचलं आहे.
ऑपरेशन लोटस हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनलाय -शिवसेना
शिवसेनेनं म्हटलंय की, “देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अशा अनेक संभ्रमित गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे. सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला.”
ईडीसमोर शिंदे गटाने गुडघे टेकले; सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
दिल्लीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. सगळ्यांत महत्त्वाची घडामोड दिल्ली राज्यात घडली. ईडी, सीबीआयचा वापर करून केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘आप’चे आमदार फोडण्यासाठी वीस-वीस कोटी रुपयांची ‘ऑफर’ दिल्याचा आरोप तर स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच केला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी किती घातक आहे हे किळसवाण्या पद्धतीने समोर आले. महाराष्ट्रात याच पद्धतीने ऑपरेशन केले गेले, पण मोठे राज्य असल्याने व शिवसेना फोडणे हाच मुख्य अजेंडा असल्याने ईडीचा धाक अधिक पन्नास ‘खोके’ अशी बेगमी केली असे सर्रास बोलले जाते. महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत. ते भाजप व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले.”
“महाराष्ट्रात शिवसेना नेते संजय राऊत हे बेडरपणे ईडीला सामोरे गेले. ते मऱ्हाटी बाण्याने लढले, पण वाकले नाहीत व सच्च्या शिवसैनिकाप्रमाणे झुंजले. तसेच कडक धोरण मनीष सिसोदिया यांनी स्वीकारले. सिसोदिया हे छत्रपती शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे गरजले. ‘‘मरण पत्करीन, पण शरण जाणार नाही. मला खोट्या प्रकरणात गुंतवले आहे,’’ असे संजय राऊत शेवटपर्यंत म्हणाले व तुरुंगात जाणे त्यांनी पसंत केले. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा, नाहीतर ईडीचा फास आवळू, अशा धमक्या त्यांनाही दिल्या गेल्या होत्या. शिवाय राऊत यांनी हा सर्व प्रसंग राज्यसभेचे तत्कालिन सभापती व्यंकय्या नायडू यांनाही कळवला होता. पण सध्या कोण कोणाचे ऐकणार? ना पेशी ना सुनवाई. तारखांचाच खेळ सुरू आहे”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.