मुंबई वज्रमूठ सभा : “मोदीजी, तुमच्या भोकं पडलेल्या टिनपाटांना बूच घाला, अन्यथा…”, ठाकरे कडाडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

ShivSena (UBT) Chief Uddhav Thackeray Speak in Vajramuth Rally in Mumbai
ShivSena (UBT) Chief Uddhav Thackeray Speak in Vajramuth Rally in Mumbai
social share
google news

मुंबई : मोदीजी, तुमची भोकं पडलेली टिनपाटं मला, आदित्यला, माझ्या कुटुंबियांना जे रोज बोलतात, त्यावर का तुम्ही गप्प आहात? या भोकं पडलेल्या टिनपाटांना बूच घाला, म्हणजे सगळं ठीक होईल, असं म्हणतं शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपमधील प्रवक्त्यांवर टीका केली. ते महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलत होते. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (UBT) सर्व नेते उपस्थित होते. (ShivSena (UBT) Chief Uddhav Thackeray Speak in Vajramuth Rally in Mumbai)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकची निवडणूक जवळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने मला 91 वेळा शिव्या दिल्या. तुम्ही शिव्या मोजणारी सभ्य माणसं आहाता. मला मोदी साहेबांना सांगायचं आहे, मी शिव्या देण्याचं समर्थन करत नाही. पण तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस मला शिव्या देत आहे, मग त्याचवेळी तुमची भोकं पडलेली टिनपाटं मला, आदित्यला, माझ्या कुटुंबियांना जे रोज बोलतात, त्यावर का तुम्ही गप्प आहात?

अजूनही ते ज्या भाषेत बोलतात, त्या भाषेत माझा शिवसैनिक अजूनही बोललेला नाही. संजय राऊतही त्या भाषेत बोलले नाहीत. आम्ही तुमचा मान ठेवतो, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण तुम्ही त्या भोकं पडलेल्या टिनपाटांना बुच घाला, म्हणजे सगळं ठीक होईल. तुमची लोकं वाट्टेल ते बोलणार, मग त्यावर आमची लोकंही बोलणारचं, असा इशारा यावेळी ठाकरेंनी दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बारसूला जाणार आणि बोलणार, तुम्ही कोण मला आडवणारे?

यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी बारसूबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात बारसूचा विषय भडकलेला आहे. येत्या 6 तारखेला बारसूला जाऊन लोकांना भेटून बोलणार. कसं काय तुम्ही मला आडवू शकता? तो पाकव्याक्त काश्मीर नाही, बांगलादेश नाही, माझ्या महाराष्ट्रातील रत्नागिरीतील तो भाग आहे. 6 तारखेला आधी मी बारसूला जाणार आणि नंतर महाडच्या सभेला जाणार, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

त्या पत्रात मी ‘गोळ्या घाला’ असं म्हटलं होतं का?

मी बारसूची जागा सुचवलिल्याच पत्र दाखवतात. हो मी सुचविली. पण त्या पत्रात असं कुठं लिहिलं होत का पोलीस घुसवा, अश्रूधूर सोडा, प्रसंगी गोळ्या घाला. आमचं सरकार असताना बारसूमध्ये प्रकल्प होईल तो लोकांच्या संमतीनेच होईल, असं धोरणं होतं. पण हे उलट्या पायाचं आणि उलट्या काळजाचं सरकार आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

ADVERTISEMENT

उदय सामंत जातात ते चालतं का?

उदय सामंत-शरद पवार यांच्या भेटीवर ठाकरे म्हणाले,  “आज तिन्ही पक्ष एकत्र आहेत. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा मी पवारांच्या अंमलाखाली गेलो, राष्ट्रवादी दादागिरी करत आहे, अशी बोंब मारत होते. पण आज उदय सामंत पवारांना भेटले. तुम्ही गेला तर चालतं? पण उद्धव ठाकरेंनी करायचं नाही. पण स्वत: शरद पवारांकडे सल्ला मागायला जाता, त्याचं काय? असं म्हणतं त्यांनी सामंत यांच्यावर टीका केली.

ADVERTISEMENT

मुंबईतील भांडवलशाहीवर काय म्हणाले ठाकरे?

यावेळी ठाकरे यांनी मुंबईतून सगळी कार्यालये मुंबई बाहेर नेत आहेत, असं म्हणतं पुन्हा एकदा मुंबईचं महत्व कमी करायचं सुरु असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मुंबईमधील आर्थिक केंद्र गेलं, मोठं-मोठी ऑफिसेस गुजरातला गेले. अनेक कंपन्या गेल्या, उद्योग गुजरातल्या गेले.  ही भांडवलदारी वृत्ती आहे, सगळ ओरबडायचे. मुंबई देशात सर्वाधिक महसूल देणारे शहर ते यांना कापायचे आहे. आता मुंबईच्या ठेवींवर डोळा आहे आणि मिंधे हे सगळे बघत आहेत. पण एक सांगतो, जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचे आम्ही तुकडे-तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

अदाणींचे चरित्र पुस्तकात द्या :

अदाणींची चौकशीची मागणी केली जात आहे. पण माझं मत वेगळं आहे. त्यांची चौकशी करण्यापेक्षा त्यांचे चरित्र शालेय पुस्तकात द्या. म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील गरीब जनतेपुढे रोज रात्री काय खायचं याचा प्रश्न असतो, त्यांना अदाणी कसं व्हायचं हे कळेलं. अडाणी आहोत आता अदाणी कसं व्हायचं हे समजून घ्या, असे ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT