गृहमंत्री की पोलीस.. तुम्हाला माहितीय पोलिसांना लाठीचार्जचा आदेश कोण देतं?
जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवरून लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट आरोप केले. पण पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश नेमके कोण देतो? याविषयी जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनावेळी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि पॅलेट्स गनचा वापर या मुद्द्यावरून आज संसदेद अक्षरश: रणकंदन माजलं. कारण, विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभेत थेट गृहमंत्री अमित शाहांवरच निशाणा साधला.
'गृहमंत्र्यांनी आमच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यास अधिकृत परवानगी दिली, त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या शरीरात छर्रे घुसविले, त्यांनी भारतातील विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले. बळाचा वापर करण्याची अधिकृत परवानगी केवळ गृहमंत्रीच देऊ शकतात; गृहमंत्री किंवा पंतप्रधान यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही ती देऊ शकत नाही.' असा गंभीर आरोप राहुल गांधींनी लोकसभेत केला.
राहुल गांधींच्या याच आरोपानंतर एक प्रश्न आता वारंवार विचारला जातो आहे की, खरंच... आंदोलकांवर लाठीचार्ज किंवा पॅलेट्स गन चालविण्याचे आदेश थेट गृहमंत्री देऊ शकतात का?
कायदा नेमकं काय सांगतो?
हा संपूर्ण विषय आपण कायद्याच्या आधारावर समजून घेऊयात. सर्वात आधी लाठीचार्ज हा जमाव नियंत्रणासाठी वापरला जाणारा Use of Force चा एक प्रकार आहे. जेव्हा एखादा जमाव कायद्याचे उल्लंघन करतो, हिंसक बनतो, दगडफेक करतो, सरकारी मालमत्तेचे नुकसान करतो किंवा लोकांच्या जीविताला धोका निर्माण करतो.. तेव्हा पोलिसांकडून आवश्यक तेवढ्या बळाचा वापर केला जाऊ शकतो.
