भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात BJP चा पराभव का झाला?
bihar bankipur datia bypoll results : बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालांमागील कारणांवर आणि मतदानाच्या ट्रेंडवर रुद्रा रिसर्चने सविस्तर विश्लेषण मांडले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात BJP चा पराभव का झाला?
निकालांमागील कारणांवर आणि मतदानाच्या ट्रेंडवर रुद्रा रिसर्चने सविस्तर विश्लेषण
पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या दोन्ही मतदारसंघांकडे देशाचे लक्ष वेधले गेले. बिहारमधील बांकीपूर ही जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राज्यसभेवर निवड झाल्यानंतर रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेवरील पोटनिवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. दुसरीकडे मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली. रुद्रा रिसर्चने मतदानापूर्वी दिलेला एक्झिट पोल जवळपास अचूक ठरल्याचा दावा संस्थेचे प्रतिनिधी विशाल लिंगायत यांनी केला. त्यांच्या मते, गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण, मतदारांशी संवाद आणि स्थानिक राजकीय घडामोडींचा अभ्यास करून हे अंदाज व्यक्त करण्यात आले होते.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पाऊस घालणार धुमशान, काही जिल्ह्यांना मोठा अलर्ट
स्थानिक प्रश्नांवर केंद्रित प्रचार हा महत्त्वाचे घटक
रुद्रा रिसर्चच्या विश्लेषणानुसार, बिहारमधील बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी सुमारे 19 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. या विजयामागे भाजपने उमेदवार बदलल्याने निर्माण झालेला राजकीय संदेश, प्रशांत किशोर यांची गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली सातत्यपूर्ण जनसंपर्क मोहीम आणि बेरोजगारी, पलायन, ड्रेनेजसारख्या स्थानिक प्रश्नांवर केंद्रित प्रचार हे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, हा मतदारसंघ पारंपरिक जातीय समीकरणांसाठी ओळखला जात असला तरी यावेळी मुद्द्यांवर आधारित राजकारणाला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचा दावा करण्यात आला. विशेषतः 18 ते 35 वयोगटातील मतदार मोठ्या प्रमाणावर प्रशांत किशोर यांच्या बाजूने वळल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्याचबरोबर विविध सामाजिक गटांमधूनही त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळाल्याचे विश्लेषणात नमूद करण्यात आले.
हेही वाचा : पुण्याची गोष्ट: MSRTC च्या वतीने तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशसाठी विशेष टूर पॅकेजेस
