Chandrashekhar Bawankule : “ठाकरे, राऊत यांचे अश्रू थांबले नाहीत, त्यामुळे…”

भागवत हिरेकर

Onion price chandrayaan 3 : bjp maharashtra president chandrashekhar bawankule hits out at uddhav thackeraya and mp sanjay Raut.

ADVERTISEMENT

Chandrayan 3 : bjp president chandrashekhar bawankule recites to uddhav thackeray and sanjay Raut after shiv sena ubt criticised narendra modi and devendra fadnavis.
Chandrayan 3 : bjp president chandrashekhar bawankule recites to uddhav thackeray and sanjay Raut after shiv sena ubt criticised narendra modi and devendra fadnavis.
social share
google news

Uddhav Thackeray Chandrashekhar Bawankule Latest news : ‘पंतप्रधान मोदी म्हणजे एक अजब रसायन आहे’, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने भाजपला लक्ष्य केले. त्यानंतर यावर भाजपकडून पलटवार करण्यात आलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊतांना लक्ष्य केले आहे.

सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.”

“संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ जी शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही”, असा खोचक टोला बावनकुळेंनी ठाकरे आणि राऊतांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या डोळ्यात पाणी

“कांद्याच्या प्रश्नी देवेंद्र फडणवीस यांनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज (25 ऑगस्ट) त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली. उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मोदी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल”, असे बोल बावनकुळेंनी ठाकरेंना सुनावले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp