'धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, मी सुद्धा एका सेकंदात...' मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान

मुंबई तक

'धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता', असं विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई Tak शी बोलताना केलं आहे.

ADVERTISEMENT

मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान
मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान
social share
google news

मुंबई: संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या अटकेनंतर राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी विरोधक आणि काही सत्ताधारी नेते हे जोरदार मागणी करत आहेत. मात्र, आता पहिल्यांदाच एका मंत्र्याने धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा.. असं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. 

शिवसेनेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता असं विधान केलं आहे. पाहा प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले. 

'धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा...'

प्रश्न: अंजली दमानियांनी आरोप केला की, कृषी साहित्य हे अधिक किंमतीत धनंजय मुंडेंनी खरेदी केल्या होत्या ते कृषी मंत्री असताना. याची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती. यावरून एकनाथ शिंदेंबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो. 

प्रताप सरनाईक: मी सुद्धा मंत्री आहे आणि एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. शेवटी जबाबदारी तुम्ही मुख्यमंत्र्यांवर टाकून चालणार नाही ना. तुम्ही पालकमंत्री आहात. पालकमंत्री हा सर्वस्वी असतो जिल्हाचा. तुम्हाला जर एखादी वस्तू विक.च घ्यायची असेल, निविदा प्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांची अनुमती घ्यायची गरज नाही. शेवटी पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी तुमचीच आहे. त्यामुळे याच्या-त्याच्यावर ढकलून चालणार नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp