दिशा सालियन प्रकरण CBI कडे गेल्यावर आदित्य ठाकरेंनी दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया
Disha Salian प्रकरणात Bombay High Court ने CBI चौकशीचे आदेश दिल्यानंतर Aaditya Thackeray यांनी या सगळ्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत त्यांनी BJP वर बदनामीचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, आपल्याविरोधात दीर्घकाळापासून बदनामीची मोहीम चालवली जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला.
आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, ‘याचा माझ्याशी काहीही संबंध नाही’, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांना महत्त्व देण्यास आपण तयार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षाला आव्हान देणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य केले जाते, असा आरोप करत त्यांनी आपल्या विरोधातील आरोपांची तुलना राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक वर्षे करण्यात आलेल्या राजकीय आरोपांशी केली.
दिशा सालियन प्रकरणात CBI चौकशीचे आदेश
दिशा सालियनच्या मृत्यूच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेत CBI ला तपासाची जबाबदारी सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने CBI ला या प्रकरणात औपचारिक FIR दाखल करून तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा>> बाळासाहेबांचं निधन, ठाकरेंचं 'पक्षप्रमुख' पद.. शिंदेंचे वकील 'या' युक्तिवादाने गेम फिरवणार?
दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या व्यवस्थापनाशी काही काळ संबंधित होती. जून 2020 मध्ये मुंबईतील एका उंच इमारतीवरून पडून तिचा मृत्यू झाला होता.
