'घराणेशाहीपेक्षा एकाधिकारशाही घातक',ठाकरेंचा मोदींवर घणाघात

मुंबई तक

भाजप ज्या प्रमाणे घराणेशाहीवर टीका करते, विरोध करते त्याच प्रमाणे आमचाही त्यांच्या एकाधिकारशाहीला विरोध असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

mahavikas aghadi
political
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपला मतदान करण्यापेक्षा आत्महत्या करेन

point

घराणेशाहीपेक्षा एकाधिकारशाही घातक

point

आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारं

Uddhav Thackeray : ज्या साध्या साध्या गोष्टी सामान्य शेतकऱ्याला समजतात, त्या सुशिक्षित लोकांना का समजत नाहीत'  असा सवाल उपस्थित करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. यावेळी भाजपच्या हिंदुत्वावर (Hinduism) पुन्हा टीका करत त्यांनी घराणेशाही आणि एकाधिकारशाहीवरूनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

लोकांना सगळं समजतं

'भारतरत्न पुरस्कार हे निवडणुकीच्या तोंडावर देत भाजपला जर वाटत असेल की, त्यामुळे त्या त्या प्रदेशातील लोकांवर त्याचा परिणाम होतो. मात्र आता लोकांना सगळ्या गोष्टी समजतात' असं सांगत त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. 

लोकं विश्वास ठेवणार नाही;

यावेळी 'त्यांनी भाजप निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केलेल्या अनेक गोष्टींवर आता लोकं विश्वास ठेवणार नाहीत असाही टोला त्यांनी भाजपला लगावला.'

हे ही वाचा >> "या झुंडशाहीला...", वागळेंवरील हल्ल्यानंतर पवार संतापले

पक्ष संपवण्याचं काम

उद्धव ठाकरेंनी टीका करताना 'भाजप नेत्यांवर, पक्षांवर अनेक प्रकारच्या कारवाय करून संपवण्याचं जे काम चालू केलं आहे. ते भयंकर आहे. मात्र जनसामान्यांच्या मनात तुमच्याविषयी काय भावना आहे ती मतं तुम्ही सामान्य शेतकऱ्यांकडून जाणा' असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp