Sharad Pawar : "ही झुंडशाही...", निखिल वागळेंवरील हल्ल्यानंतर पवार संतापले

भागवत हिरेकर

Sharad Pawar Latest News : शरद पवार यांनी निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर संताप व्यक्त केला. त्याचबरोबर या झुंडशाही प्रवृत्तीला पुण्यातील आणि महाराष्ट्रातील जनताच धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.

ADVERTISEMENT

Sharad pawar condem of attacked on nikhil wagle
निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निखिल वागळेंवर पुण्यात हल्ला

point

शरद पवारांची राज्य सरकारवर टीका

point

सरकारला म्हणाले झुंडशाही प्रवृत्तीचं सरकार

Sharad Pawar nikhil wagle : पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह असीम सरोदे आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर शरद पवारांनी संताप व्यक्त केला. (Sharad Pawar First Reaction on attack on Nikhil Wagle)

शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर भूमिका मांडताना पवारांनी राज्यकर्त्यांना इशारा दिला.

शरद पवार म्हणाले, झुंडशाही प्रवृत्तीला जनताच... 

पुण्यात निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. राज्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. तुम्ही याकडे कसं बघता, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "पुण्यामध्ये एका जाणकार व्यक्तीवर हल्ला केला गेला. त्याच्या गाडीवर हल्ला केला गेला. गाडीच्या काचा फोडल्या. याचा अर्थ असाच आहे की, आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात. ही झुंडशाही लोकांना पटणारी नाही."

"आता सत्ता हातात आहे. पोलीस दल हातात आहे. त्याचा गैर ऊपयोग, गैरफायदा घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. माझी खात्री आहे की, पुण्यातील समंजस्य, शहाणा नागरिक आणि पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा दिल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. 

भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांना पवारांचे खडेबोल

शरद पवार म्हणाले की, "अपेक्षा अशी होती की, ज्या पक्षाच्या पुण्यातील सहकाऱ्यांनी हे उद्योग केले, त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्याने याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता होती. ती घेतली गेली नाही. ही दूर्दैवी बाब आहे." 

यासंदर्भात गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे. तुम्ही याचं समर्थन करता का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, "नाही, मुद्दा असा आहे की, विरोधकांनी मागणी करणं हे विरोधकांचं कर्तव्य आहे. मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, पण या गोष्टी घडताहेत, त्यावेळी ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही."

हे वाचलं का?

    follow whatsapp