तुमच्या मुलांना हिंदी भाषा शिकावीच लागणार, समजून घ्या संपूर्ण प्रकरण काय

मुंबई तक

महाराष्ट्रात प्राथमिक शाळांमधील पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय तृतीय भाषा म्हणून सक्तीचा करण्यात आला आहे. जाणून घ्या सरकारचं हे नवं धोरण काय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकणे सक्तीचे करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिक्षण विभागाने जारी केलेल्या नवीन धोरणानुसार, येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सर्व शासकीय, खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. पण या निर्णयामुळे आता सरकारवर बरीच टीका देखील केली जात आहे.

निर्णयाची पार्श्वभूमी

महाराष्ट्रात सध्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा शिकवल्या जातात, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजीसह मराठी ही दुसरी भाषा शिकवली जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP) मधील त्रिभाषिक सूत्राच्या अनुषंगाने आणि देशातील संपर्क भाषा असलेल्या हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

'संपूर्ण देशात एक संपर्क भाषा असावी, म्हणून...', CM फडणवीसांचं मोठं विधान

"आम्ही नवीन शिक्षण धोरण राबवत आहोत ज्याअंतर्गत आम्ही येथे प्रत्येकाने मराठी तसेच देशातील इतर भाषा शिकल्या पाहिजेत याची खात्री करण्याचा प्रयत्न करत आहोत. देशभरात एक संपर्क भाषा असावी ही केंद्र सरकारची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हे केले जात आहे असे मला वाटते. येथे मराठी अनिवार्य असेलच असे आम्ही आधी ठरवले होते, परंतु त्यासोबतच प्रत्येकजण इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषा शिकू शकतो."

हे ही वाचा>> SSC And HSC Result 2025 : दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट

नव्या धोरणाची वैशिष्ट्ये

कोणाला लागू?: पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना, मग ते कोणत्याही माध्यमाच्या शाळेत शिकत असोत.