'मी आदर मागितला, मला अपमान मिळाला...', 20 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी का सोडलेली शिवसेना?
Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला नाही, तर ते नेमकं कसं घडलेलं ते सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रथम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतभेद विसरण्याबद्दल विधान केलेलं आणि नंतर त्याला उत्तर देताना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या हिताचा हवाला देत किरकोळ वाद मागे ठेवण्याचे संकेत दिले. उद्धव यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला आणि 2006 मध्ये त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्ष स्थापन केला.
'मी आदर मागितला, मला अनादर मिळाला'
तारीख- 18 डिसेंबर 2005, ठिकाण- शिवाजी पार्क जिमखाना. राज ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषद बोलावली होती. ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेपासून वेगळे होण्याची घोषणा केलेली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणालेले की, 'त्यांनी आदर मागितला होता, पण त्यांना फक्त अपमान आणि अपमान मिळाला.' खरं तर, राज ठाकरे यांना शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जात होते. कारण ते उद्धव यांच्यापेक्षा पक्षात अधिक सक्रिय होते आणि त्यांची प्रतिमा देखील त्यांचे काका बाळासाहेबांसारख्याच एका ज्वलंत नेत्याची होती.
हे ही वाचा>> 'एवढ्या लोकांना धोका देणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा?', मनसेच्या 'त्या' नेत्याच्या तिरक्या विधानाचा अर्थ काय?
राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला नाही, तर हे सगळं 1995 मध्येच सुरू झालं होतं. दोन्ही भावांमधील सतत वाढत जाणारे मतभेद आणि हक्कांसाठीचा संघर्ष होता. जरी, राज ठाकरे हे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वात जवळचे होते. बाळासाहेबांची तीच वृत्ती, थेटपणे बोलण्याचे तेच धाडस हे सगळे गुण राज ठाकरेंच्या अंगी उपजतच होते. त्यामुळेच राज ठाकरे हेच बाळासाहेबांचा उत्तराधिकारी असतील असं मानलं जात होतं. कारण, तोपर्यंत उद्धव ठाकरे राजकारणात इतके सक्रिय नव्हते.
पक्षात उद्धव ठाकरे यांचं स्थान वाढू लागलं
त्यानंतर 1995 साली उद्धव यांनी पक्षाचे काम पाहण्यास सुरुवात केली आणि पक्षाच्या निर्णयांमध्ये बाळसाहेब ठाकरेंना मदत करण्यास सुरुवात केली. यानंतर, 1997 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत, राज ठाकरेंच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून, बहुतेक तिकिटे उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार वाटण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवल्यानंतर, उद्धव यांचे पक्षावरील वर्चस्व अधिक मजबूत झाले आणि राज ठाकरे यांना बाजूला करण्यात आले. यामुळे, दोन्ही भावांमधील स्पर्धा आणि मतभेदांची दरी आणखी वाढली.