इंडिया टुडे GDB सर्व्हे: स्त्री-पुरुष समानतेत महाराष्ट्राचा नंबर कितवा? 'हे' राज्य सर्वात खालच्या नंबरवर
India Today GDB Survey: India Today आणि How India Lives च्या Gross Domestic Behaviour (GDB) Survey मध्ये नागरी जाणीव, सामाजिक शिष्टाचार, स्त्री-पुरूष समानता, भेदभाव आणि सार्वजनिक सुरक्षितता यासारख्या मुद्द्यांवर लोकांचे मत घेतले गेले. या सर्वेक्षणात महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे हे आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

India Today Gross Domestic Behaviour Survey: इंडिया टुडे ग्रुप आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म How India Lives यांनी एक अनोखं मत सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात देशाची नागरी जाणीव, लोकांचे सुसंस्कृत आणि प्रामाणिक वर्तन, स्त्री-पुरुष समानता आणि विविधता-भेदभाव यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लोकांचे मत घेण्यात आले.
देशाच्या सामाजिक शिष्टाचाराचा शोध घेण्यासाठी केलेल्या या सर्वेक्षणाला सकल घरगुती वर्तन (GDB-Gross Domestic Behaviour Survey) असे नाव देण्यात आले. ज्याप्रमाणे एखाद्या देशाची आर्थिक स्थिती सकल देशांतर्गत उत्पादनाद्वारे मोजली जाते, त्याचप्रमाणे या GDB सर्वेक्षणात, लोकांचे सभ्य वर्तन, सहानुभूती, चांगले हेतू जाणून घेऊन आपला देश एक सुसंस्कृत समाज म्हणून कुठे उभा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आपल्या शेजारी, इतर धर्म आणि जातींच्या लोकांशी वागणे, नागरी जाणीव, स्त्री-पुरूष समानता, प्रामाणिकपणा, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक सुरक्षितता यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल आपण कसे आणि काय विचार करतो? भारतातील कोणते राज्य सामाजिक शिष्टाचारात अव्वल स्थानावर आहे आणि कोणते राज्य तळाशी आहे? या सर्वेक्षणात अशा सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राबाबत काय निकाल आले आहेत ते आपण जाणून घेऊया. विशेषतः जर आपण स्त्री-पुरुष समानतेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल बोललो तर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे आपल्याला या सर्वेक्षणातून समजेल.
हे ही वाचा>> India Today GDB सर्व्हे: धक्कादायक! महाराष्ट्रातल्या लोकांचं वर्तन कसं आहे, डोळे उघडवणारा रिपोर्ट
जीडीबी सर्वेक्षणात, भारतीय लोक त्यांच्या घरगुती आणि सामाजिक जीवनात पुरुष आणि महिलांच्या भूमिकेकडे कसे पाहतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 9000 हून अधिक प्रतिसादकर्त्यांना 6 प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांच्या उत्तरांमुळे भारताचे असे चित्र निर्माण झाले आहे की तो पितृसत्ताकतेच्या गंभीर प्रश्नांमध्ये अडकला आहे.










