'शाई'मुळे लोकशाही धोक्यात? मार्कर पेनचा वाद, पुसली जाणारी शाई अन्... नेमकं खरं काय?

मुंबई तक

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेसाठी आज मतदान पार पडलं. पण यावेळी मतदारांच्या बोटावर जी शाई लावली जाते ती सहजपणे पुसली जात असल्याने यावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली जात आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये, विशेषतः मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत मतदानानंतर मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याच्या आरोपांमुळे मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधी पक्षांनी या प्रक्रियेवर गंभीर आरोप केले असून, यामुळे निवडणुकीत फसवणूक होऊ शकते असा दावा केला आहे. अनेकांनी असाही आरोप केला आहे की, शाईमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले असले तरी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असल्याने या मुद्द्याची चर्चा जोरात आहे. 

वादाचे मूळ आणि आरोप

निवडणुकीत अमिट शाईच्या जागी मार्कर पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत आहेत. या मार्कर पेनची शाई ही अॅसिटोन, सॅनिटायझर किंवा नेल पॉलिश रिमूव्हरने सहज पुसले जाऊ शकते, असा दावा अनकेजण करत आहेत. तसेच त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

या मुद्द्याची सुरुवात कल्याणमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (एमएनएस) उमेदवार उर्मिला तांबे यांनी केली. त्यांनी राज्य निवडणूक आयोगावर सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा आरोप केला. याशिवाय मुंबई Tak ने देखील याबाबतचा फॅक्ट चेक करून पाहिला. ज्यामध्ये अॅसिटोन लावून बोटावरील शाई गायब होत असल्याचं दिसून आलं. 

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, "आता शाईच्या जागी मार्कर पेन वापरले जात आहे. हे अस्वीकार्य आहे. अशा फसव्या निवडणुका निरुपयोगी आहेत. मी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो." 

हे वाचलं का?

    follow whatsapp