NCP : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने थेट 10 कारणंच सांगितली
महाराष्ट्र भाजपकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात जयंत पाटील यांची कशी घुसमट होत आहेत आणि ते का राष्ट्रवादी सोडू शकतात, याची काही कारणं सांगितली आहेत.
ADVERTISEMENT

Maharashtra politics : “जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, लवकरच ते मार्गक्रमण करतील”, असा दावा केला शिवसेनेचे प्रवक्ते आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी. संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर जयंत पाटलांनी “संजय शिरसाटांपेक्षा माझी विश्वासार्हता जरा जास्त असेल नाही का? त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी प्रतिक्रिया घेणं म्हणजे जरा जास्तच झालं”, असं सांगत भूमिका स्पष्ट केली. पण, आता भाजपने यात उडी घेतली असून, राष्ट्रवादी सोडण्याची दहा कारणंच सांगितली आहेत.
महाराष्ट्र भाजपकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात जयंत पाटील यांची कशी घुसमट होत आहेत आणि ते का राष्ट्रवादी सोडू शकतात, याची काही कारणं सांगितली आहेत.
Jayant Patil : भाजपने कोणती कारण सांगितली?
भाजपने या व्हिडीओत म्हटलंय की, “शरद पवारांनी जे काही निवृत्तीनाट्य रंगवलं होतं त्या नाटकात शरद पवारांव्यतिरिक्त बेस्ट परफॉर्म केलं ते जयंत पाटलांनी. किती रडले होते ते. पण आता जाणवतं ते अश्रु खरे होते, फक्त कारण वेगळं होतं म्हणूनच जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार अशी कुजबूज सुरू झाली आहे. जयंत पाटलांकडे पक्षातून बाहेर पडण्यासाठी एक नाही, तर दहा कारणं आहेत.”
शरद पवारांनी जयंत पाटलांची नाचक्की केली -भाजप
“2019 पासून शरद पवारांनी जयंत पाटलांना डावलायला सुरूवात केली. आणि कधीकाळी गृहमंत्रालय भूषवणाऱ्या पाटलांना जलसंधारण मंत्रीपद देऊन त्यांची नाचक्की केली. त्यात राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार असे दोन गट आणि पाटील याही गटातील नाही आणि त्याही. त्यामुळे त्यांचं एकूणच राष्ट्रवादीतलं भविष्य अंधारातच राहिलं”, असं महाराष्ट्र भाजपने म्हटलं आहे.