"सुनील तटकरेंचं 'ते' प्रकरण उद्धव ठाकरेंपर्यंत जात होतं", सोमय्यांचा मोठा स्फोट

मुंबई तक

Uddhav Thackeray And Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एक किस्सा सांगितला.

ADVERTISEMENT

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुंबई Tak चावडीवर.
किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

किरीट सोमय्यांनी ठाकरेंचा कोणता किस्सा सांगितला?

point

सुनील तटकरेंच्या प्रकरणात कोण अडकणार होतं?

point

किरीट सोमय्या मुंबई Tak चावडीवर

Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे खुनशी आणि संकुचित आहेत, असे सांगत भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी एक प्रसंग सांगितला. यावेळी सोमय्यांनी शरद पवारांचंही कौतुक केलं. 

'मुंबई Tak चावडी' कार्यक्रमात किरीट सोमय्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. त्याचबरोबर त्यांनी काही किस्सेही यावेळी सांगितले.  

गेल्या वर्षभरात तुमचं उद्धव ठाकरे, संजय राऊतांसोबत बोलणं-भेटणं झालंय का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना सोमय्यांनी शरद पवारांचा उल्लेख केला.

हेही वाचा >> "मातोश्रीवर अटॅक करायला फडणवीसांनी सांगितलं", सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट 

किरीट सोमय्या म्हणाले, "मला निगेटिव्ह उदाहरण द्यायचं नव्हतं, यासंबंधात. म्हणून मी शरद पवारांचं नाव पॉझिटिव्हली घेतलं होतं. कारण त्यांनी सांगितलं होतं की, किरीट सोमय्याला हात लागता कामा नये. त्यांनी दुसरं वाक्य सांगितलं होतं की, त्यांना (किरीट सोमय्या) हात लागला तर राष्ट्रवादी काँग्रेसचं संपणार. संपणार म्हणजे खूप डॅमेज होणार. म्हणजे लोकांनाही हे आवडणार नाही. वैयक्तिक अफेक्शन काही नाही."

हे वाचलं का?

    follow whatsapp