मतदानासाठी वापरलेली शाई पुसली जातेय, 'मुंबई Tak'चा फॅक्ट चेक; निवडणूक आयोगाने याबाबत काय म्हटलं होतं? VIDEO
Maharashtra Mahapalika Election 2026 : निवडणुकीत 'एका व्यक्तीचे एकच मत' हे तत्व राखण्यासाठी ही शाई अत्यंत महत्त्वाची आहे. एकदा मतदान केल्यावर मतदाराच्या बोटावर ही शाई लावली जाते, जेणेकरून तो व्यक्ती पुन्हा मतदान केंद्रावर जाऊन दुसरे मत देऊ शकणार नाही. हे मतदानातील गैरप्रकार आणि 'बोगस व्होटिंग' रोखण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मतदानासाठी वापरलेली शाई पुसली जातेय, मुंबई Tak फॅक्ट चेक
निवडणूक आयोगाने याबाबत काय म्हटलं होतं? VIDEO
Maharashtra Mahapalika Election 2026 : मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज (दि.15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, मतदान केल्यावर बोटावर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. हा आरोप खरा आहे का? यासंदर्भात 'मुंबई Tak' ने फॅक्ट चेक केलाय. यातून ही शाई खरंच पुसली जात असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, निवडणूक आयोगाने बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईबद्दल काय काय माहिती दिली होती? हे देखील सविस्तर जाणून घेऊयात..
निवडणूक आयोगाच्या पीआरओंनी काय माहिती दिली?
2012 पासून शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मार्कर वापरला जातो. शाई काही मिनिटात सुकते, पुसली जात नाही, असं आयोगाने सांगितलंय.
निवडणूक आयोगाने बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईबद्दल दिलेली माहिती खालीलप्रमाणे
मतदानाच्या दिवशी तुमच्या बोटावर लावली जाणारी ती निळी शाई म्हणजे याला तांत्रिक भाषेत 'Indelible Ink' (अविभाज्य किंवा न पुसता येणारी शाई) असे म्हणतात.
या शाईबद्दलची सखोल आणि विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे:









