Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा होणार राजकीय भूकंप? एकनाथ शिंदे दिल्लीत, रिव्हर्स ऑपरेशन लोट्स अन्...
Maharashtra Politics Eknath Shinde: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष सध्या बराच चिंतेत असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics Devendra Fadnavis and Eknath Shinde: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढलेलं अंडरस्टँडिंग आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसोबतची धुसफूस. अलिकडेच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एका हॉटेलच्या बंद खोलीत भेटही झाली असल्याचं समोर आलं होतं. या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना विधानसभेत त्यांच्याकडे येण्याची खुली ऑफरही दिली होती. असं असताना आज (6 ऑगस्ट) अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. खरं तर एकनाथ शिंदे यांची मागील आठवड्यातील ही दुसरी दिल्ली वारी आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी..
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील वाढत्या जवळीकतेमुळे जर कोणता पक्ष सर्वात जास्त अस्वस्थ असेल तर तो म्हणजे शिवसेना शिंदे गट. शिंदे गटाला हे समजले आहे की त्यांना आता कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच कारणास्तव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांनी आज भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली. सुरुवातीला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यात जवळजवळ 30 मिनिटे चर्चा झाली.
हे ही वाचा>> 'ठाकरे बंधूची युती अन् मुंबई...' उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सगळंच सांगून टाकलं
यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी काही काळ पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आणि त्यांच्या पक्षाची नेमकी स्थिती यावर चर्चा केली असल्याची दाट शक्यता आहे.
फडणवीस आणि शिंदे यांच्यातील वाढतं अंतर
गेल्या वर्षी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून, एकनाथ शिंदे प्रत्येक मुद्द्यावर जोरदार बार्गेनिंग करत आहेत. त्यांनी प्रथम मुख्यमंत्रीपदासाठी, नंतर महत्त्वाच्या खात्यांसाठी, विशेषतः गृहमंत्रालयासाठी, नंतर नगरविकास मंत्रालयासाठी बार्गेनिंग केली असल्याचं बोललं जातं. त्यानंतर, पालकमंत्र्यांच्या मुद्द्यावर ते देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने आव्हान देत राहिले.