'...आम्ही परत जाणार नाही', मराठा समाजाचा 'चलो मुंबई' मोर्चा आझाद मैदानावर धडकणार, जरांगेंनी CM फडणवीसांना दिला इशारा

Manoj Jarange Chalo Mumbai Morcha : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल रविवारी 24 ऑगस्ट रोजी मोठी घोषणा केली.

Manoj Jarange Latest News Update
Manoj Jarange Latest News Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जरांगेंनी CM देवेंद्र फडणवीसांवर केले आरोप

point

महादेव मुंडेंच्या हत्याप्रकरणाबाबत केलं मोठं वक्तव्य

point

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Chalo Mumbai Morcha : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल रविवारी 24 ऑगस्ट रोजी मोठी घोषणा केली. बीड जिल्ह्यातील मंजरसुम्बा येथे आयोजीत सभेत जरांगे यांनी जनतेला संबोधीत केलं. जरांगे यांनी राज्यभरातील मराठा समाजाच्या लोकांना 27 ऑगस्ट रोजी 'चलो मुंबई' मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं आहे. ही समाजाची शेवटची लढाई असेल, असं जरांगे म्हणाले. 

जनतेला संबोधीत करताना जरांगे म्हणाले, या वेळी जमा होणाऱ्या गर्दीनं सरकारला धक्का दिला पाहिजे. जर इथे याचा दणका बसला नाही, तर मुंबईत पोहोचल्यावर सरकारला खरा दबाव काय असतो, हे माहित होईल. आता लढाई मुंबईच्या रस्त्यावर लढली जाईल. 

जरांगे यांनी घोषणा केली की, 29 ऑगस्टपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आझाद मैदानावर शांतीपूर्ण धरणे आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन मराठा समाजासाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात ओबीसी श्रेणीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर असणार आहे. 

जरांगे म्हणाले, ही आरक्षणाविरोधात शेवटची लढाई आहे. आरक्षणाशिवाय आम्ही परत जाणार नाही. जरांगे यांनी लोकांना शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा आग्रह केला. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन द्यायचं नाही, असंही ते म्हणाले. कोणी दगड फेकला तर, त्याला लगेच पोलिसांच्या ताब्यात द्या. हा सरकारचा प्लॅनही असू शकतो. आंदोलन पूर्णपणे शांतीपूर्ण झालं पाहिजे. 

हे ही वाचा >> Amit Shah Interview : माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

CM देवेंद्र फडणवीसांवर केले आरोप

जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले की, ते छोट्या छोट्या समस्या निर्माण करण्याचा काम करत आहेत. फडणवीसांनी पोलिसांचा वापर करून मराठा समाजाला त्रास दिला नाही पाहिजे.

महादेव मुंडेंच्या हत्याप्रकरणाबाबत वक्तव्य

मनोज जरांगे यांनी म्हटलं, पोलिसांना मराठा समाजाला त्रास देण्याऐवजी महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना पकडलं पाहिजे. मुंडे यांचं 9 ऑक्टोबर 2023 ला अपहरण झालं होतं. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला होता. दरम्यान, या प्रकरणाची क्राईम ब्रँचकडून चौकशी सुरु आहे. 

हे ही वाचा >> “दीदी मला सुद्धा...” बहिणीने धरला ‘तो’ हट्ट! दिदीची जागेवरच सटकली अन् रस्त्यातच...

हे वाचलं का?

    follow whatsapp