Manoj jarange : 'फडणवीसांना मला...', कोर्टातून बाहेर पडताच जरांगे पुन्हा संतापले!

मुंबई तक

Manoj Jarange News : माझा महाराष्ट्र दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पूर्ण होणार आहे. आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्या शिवाय शांत राहणार नाही. मग माझ्या शरीराची परिस्थिती काहीही असो की सरकारचा कितीही विरोध असो मी फडणवीस यांचं स्वप्न हा कधीच पूर्ण होऊ देणार नाही.

ADVERTISEMENT

मला न्यायाधीशांचा सन्मान आहे म्हणून मी आज रुग्णवाहिकेतून आलो.
manoj jarange criticize devendra fadnavis maratha reservation pune court in drama product cheat case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ हेच ओबीसी यांची वाट लावत आहेत

point

मी न्यायालयच आदर करतो आणि करत राहणार आहे.

point

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्या शिवाय शांत राहणार नाही.

Manoj Jarange On Devendra Fadnavis : ओंकार वाबळे, पुणे :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी असल्याने ते हजर झाले होते. या प्रकरणात पुणे कोर्टाने (Pune Court) त्यांना दिलासा होता. या घटनेनंतर जरागेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याला मला गुंतवायचं, पण त्याचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण होऊ देणार नाही, असा आरोप करत टीका केली. (manoj jarange criticize devendra fadnavis maratha reservation pune court in drama product cheat case) 

मनोज जरांगे पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की,उपोषणामुळे मला प्रचंड त्रास होत आहे.आणि यामुळे आज मी न्यायालयात रुग्णवाहिकेत आलो आहे. मला कायद्याचा संविधानाचा तसेच न्यायाधीशांचा सन्मान आहे म्हणून मी आज रुग्णवाहिकेतून न्यायालयात हजर राहिलो आहे, असे जरांगेंनी सांगितले. 

हे ही वाचा : Narayan Rane : ''मातोश्री'त बसून धमकीची भाषा करणारे...', ठाकरेंवर राणे कडाडले!

माझा महाराष्ट्र दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पूर्ण होणार आहे. आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्या शिवाय शांत राहणार नाही. मग माझ्या शरीराची परिस्थिती काहीही असो की सरकारचा कितीही विरोध असो मी फडणवीस यांचं स्वप्न हा कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे जरांगेंनी यावेळी ठणकावून सांगितले. 

प्रकाश आंबेडकरांवर बोलताना जरांगे म्हणाले की, आम्ही त्यांना मानतो आणि मानत राहणार आहे.त्यांनी काय टीका करावी काय करू नये हा त्यांचा अधिकार आहे.ते आमच्या बाजूने लढतील याची आम्हाला आशा असून आम्ही त्यांना मानतो. 

हे वाचलं का?

    follow whatsapp