पोलिसांनी मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकारली, आता मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

Manoj Jarange Patil Interview : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेचा दाखला देत परवानगी नाकारण्यात आली असून, यानंतर जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी मुंबईतील आंदोलनाची परवानगी नाकारली

point

आता मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil Interview : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलिसांकडून यासंदर्भातील पत्र देण्यात आले असून, गेल्या वर्षीच्या आंदोलनात नियम आणि अटींचा भंग झाल्याचा दाखला देण्यात आला आहे. तसेच सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे. जरांगे पाटील यांच्या टीमकडून आंदोलनासाठी रीतसर अर्ज आणि हमीपत्र सादर करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला अधिकृत परवानगी देण्यास नकार दिला आहे. या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत सरकारवर आणि प्रशासनावर जोरदार टीका केली.

हेही वाचा : Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या आगमनादिवशी वरुणराजाची दमदार हजेरी, IMD चा अलर्ट

वकिलांची टीम पुढील निर्णय घेणार,मनोज जरांगेंचा इशारा 

परवानगी नाकारल्यानंतरही 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून जाणूनबुजून द्वेषाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे सांगत, गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात परवानगी देण्यात आली होती, मग यंदाच परवानगी का नाकारण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालयाने सांगितलेले नियम पाळून आपण आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाची परवानगी नाकारण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत, याप्रकरणी आपल्या वकिलांची टीम पुढील निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : जरांगेंना मुंबईत नो-एन्ट्री? परवानगी नाकारत पोलिसांनी काय सांगितलं?