दिल्ली: जंतर मंतरजवळ रात्री अचानक दगडफेक, पोलीस आणि आंदोलक पुन्हा आमनेसामने

मुंबई तक

नीट (NEET) मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीत दगडफेक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉल्स्टॉय मार्गावरील आंदोलक हिंसक झाले आणि त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली, ज्यात अनेक पोलीस जखमी झाले. तर पोलिसांकडून देखील लाठीहल्ला सुरू झाला आहे.

ADVERTISEMENT

protest in delhi takes a violent turn stone pelting near jantar mantar as police and protesters suddenly come face to face
CJP protesters
Google CTA

नवी दिल्ली: नीट (NEET)परीक्षा मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आता अचानक दिल्लीत दगडफेक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉल्स्टॉय मार्गावरील आंदोलक हिंसक झाले आणि त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली, ज्यात अनेक पोलीस जखमी झाले. ही घटना दिल्लीतील टॉल्स्टॉय मार्गाजवळ घडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नेहमीप्रमाणे आरएएफ (RAF) आणि पोलिसांची पथके निश्चित केलेल्या ठिकाणी तैनात असताना अचानक दगडफेक सुरू झाली. 

जेव्हा आरएएफ आणि पोलीस सक्रिय झाले, तेव्हा पोलीस आणि आरएएफ पथकावर दगड फेकण्यात आले. काही आंदोलकांकडे काठ्या होत्या आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. आरएएफ पथकाने जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. पोलिसांनी दोन-तीन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला नियंत्रणात आणले.

नेमकं काय घडलं?

नीट पेपरफुटीच्या संदर्भात दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेले आंदोलन अजूनही सुरू आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, टॉल्स्टॉय मार्गावर हिंसक आंदोलकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली, ज्यात काही पोलीस जखमी झाले. पण, या घटनेचे कारण आणि आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

हे ही वाचा>> 'पोलीस माझ्या कानात म्हणाले हे सरकार हटवा', राहुल गांधींनी सगळंच सांगितलं! राडा झाला तेव्हा काय घडलं?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जंतर मंतरवर जमलेला जमाव थोड्या अंतरावर टॉल्स्टॉय मार्गावर गेला आणि त्यांनी दगड व बाटल्या फेकल्या. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी आरएएफच्या पथकाने सौम्य बळाचा वापर केला.

हे वाचलं का?