समजून घ्या : 6 खासदारांमुळे एकनाथ शिंदेंना कोणता जॅकपॉट?
samjun ghya anuja dhakras : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटल्यास एकनाथ शिंदे यांचे एनडीएमधील राजकीय वजन वाढू शकते. या संभाव्य घडामोडींचा नेमका फायदा काय होऊ शकतो, याचा आढावा.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
समजून घ्या : 6 खासदारांमुळे एकनाथ शिंदेंना कोणता जॅकपॉट?
samjun ghya anuja dhakras : तृणमूल काँग्रेसमधील 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय) या पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीमुळे एनडीएचे लोकसभेतील संख्याबळ वाढल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात डिलिमिटेशन, महिला आरक्षण आणि एक देश-एक निवडणूक यांसारख्या महत्त्वाच्या विधेयकांसाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाच्या दृष्टीने एनडीए प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत आता पुढचा राजकीय टप्पा शिवसेनेतील संभाव्य पक्षांतरांचा असू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण : पद्मसिंहांच्या विरोधात ओमराजेंच्या बाजूने कोणते युक्तीवाद झाले होते?
ठाकरेंचे सहा खासदार फुटले तर काय परिणाम होतील?
लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत केवळ चार खासदार उपस्थित राहिल्याचा उल्लेख करण्यात आला असून उर्वरित काही खासदारांनी कौटुंबिक कारणे देत अनुपस्थिती दर्शवली होती. यामुळे या खासदारांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. जर या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला, तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार आवश्यक असलेला दोन-तृतीयांश आकडा पूर्ण होऊ शकतो. अशा परिस्थितीत शिंदे गटाचे लोकसभेतील संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढेल आणि एनडीएमध्ये त्यांचे राजकीय महत्त्व अधिक मजबूत होईल.
हेही वाचा : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण : पद्मसिंहांच्या विरोधात ओमराजेंच्या बाजूने कोणते युक्तीवाद झाले होते?









