शरद पवारांनी दिल्लीतील 'तालकटोरा'मध्ये मराठा योध्यांचे पुतळे बसवण्याची मागणी का केली? इतिहास काय?
Talkatora and Peshwa History : यंदाचं 98 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील याच तालकटोरामध्ये पार पडलं. या तालकटोराचा, पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठा साम्राज्याचा नेमका कसा संबंध आहे हे समजून घेऊ.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुघल सैन्याच्या मधून 25 हजार घोडेस्वार मराठा सैन्य तालकटोरामध्ये कसं पोहोचलं?

संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई यांना मुघलांच्या कैदेतून कसं सोडवलं?

1741 साली महम्मदशाहाने माळव्याची सनद मराठ्यांना कशी दिली?

दिल्लीतील 'तालकटोरा' या ठिकाणाचं वैशिष्ट्य नेमकं काय? वाचा सविस्तर...
मराठी माणूस आणि दिल्ली यांचं थेट संबंध हा इतिहासात अनेकदा आला. प्राचीन भारतापासून असेलली ही राजधानी काबीज करणं ही इतिहासतल्या सर्वांचीच इच्छा राहिली आहे. मात्र, मराठा साम्राज्याने अनेकदा दिल्लीवर यशस्वीरित्या स्वारी केली. जेव्हा जेव्हा दिल्ली आणि मराठी माणसाच्या इतिहासाची चर्चा होते. तेव्हा सर्वात प्रकर्षानं उल्लेख होतो, तो 'तालकटोरा'चा.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांच्या सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसंच या पत्रात त्यांनी तालकटोरा स्टेडियममध्ये मराठा योद्ध्यांचे पुतळे बसवण्याची मागणीही केली आहे.
हे ही वाचा >> रत्नागिरी: होळीदरम्यान मशिदीचा गेट तोडला? काय खरं-काय खोटं.. नेमकं प्रकरण काय?
तालकटोरामध्ये मराठी माणसानं पहिल्यांदा पाय ठेवला ती इतिहासातली महत्वाची घटना म्हणून पाहिली गेली. यंदाचं 98 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील याच तालकटोरामध्ये पार पडलं. या तालकटोराचा, पेशव्यांचा आणि पर्यायाने मराठा साम्राज्याचा नेमका कसा संबंध आहे हे समजून घेऊ.
दिल्ली जिंकणं शिवरायांची सुरुवातीपासूनचीच इच्छा...
दिल्लीचा आणि मराठी माणसाचा संबंध तसा हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्ली जिंकणं हे पहिल्यापासूनच ध्येय होतं असं इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी यांनी सांगितलं. दिल्लीत पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या 'नाते दिल्लीशी मराठीचे' या परिसंवाद पार पडला. प्राचीन हिंदुस्तानाची राजधानी असलेल्या दिल्लीवर आपली सत्ता असावी, ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती. राजाराम महाराजंचं एक पत्र आहे, जेव्हा ते जिंजीला होते तेव्हाचं. मी आता सहा लाख होण बाजूला ठेवलेत. जेव्हा दौलताबाद जिंकू तेव्हा 2 लाख होन, रायगड जिंकू तेव्हा 2 लाख होन आणि दिल्ली जिंकू तेव्हा 2 लाख होन अशी तरतूद करुन ठेवली होती असं उदय कुलकर्णी म्हणाले.