'माझा मुलगा 12 वर्षांपासून कोमात, त्याला मरण द्या', पालकांची न्यायालयात मागणी; आता न्यायमूर्ती प्रत्यक्ष जाणार अन्...

मुंबई तक

Supreme Court judges : या याचिकेतील तरुण हरीश राणा याला 2013 मध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने मेंदूला गंभीर इजा झाली. त्या अपघातानंतर तो कोमात गेला आणि आजतागायत तो शुद्धीवर आलेला नाही.

ADVERTISEMENT

Photo AI Generated
Photo AI Generated
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'माझा मुलगा 12 वर्षांपासून कोमात, त्याला मरण द्या',

point

पालकांची न्यायालयात मागणी

point

आता न्यायमूर्ती प्रत्यक्ष जाणार अन्...

नवी दिल्ली : “माझा मुलगा गेली बारा वर्षे कोमात आहे. त्याचं आयुष्य उरलेलं नाही, केवळ श्वास सुरू आहे. त्याला आता वेदनांतून मुक्त करा,” अशी हृदयद्रावक विनंती करणाऱ्या पालकांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. या भेटीसाठी 13 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने प्रकरणातील मानवी वेदना अधोरेखित केल्या. “समोर आलेला वैद्यकीय अहवाल अत्यंत दुःखद आहे. या स्थितीत या तरुणाला अशाच अवस्थेत पुढे ठेवणे योग्य ठरणार नाही,” असे मत न्यायालयाने व्यक्त केले. हा खटला केवळ कायद्यापुरता मर्यादित नसून तो मानवी करुणा, नैतिकता आणि संवेदनशीलतेची कसोटी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे केवळ कागदपत्रांच्या आधारे निर्णय न घेता, पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केले.

12 वर्षांची अंतहीन प्रतीक्षा

या याचिकेतील तरुण हरीश राणा याला 2013 मध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने मेंदूला गंभीर इजा झाली. त्या अपघातानंतर तो कोमात गेला आणि आजतागायत तो शुद्धीवर आलेला नाही. सध्या त्याचे आयुष्य पूर्णतः कृत्रिम जीवनसाहाय्यावर अवलंबून आहे. श्वसनासाठी ट्रॅकिओस्टॉमी ट्यूब, तर अन्नासाठी गॅस्ट्रोस्टॉमी ट्यूबचा वापर केला जात आहे. गेल्या बारा वर्षांच्या काळात त्याच्या प्रकृतीत कोणतीही सकारात्मक सुधारणा झालेली नाही.

वैद्यकीय अहवाल काय सांगतात?

डॉक्टरांनी सादर केलेल्या अहवालांनुसार, रुग्ण पूर्णपणे शुद्ध हरपलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या शरीरावर गंभीर बेडसोअर्स झाले असून, उपचारांनंतर बरे होण्याची शक्यता जवळपास शून्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मेंदूच्या कार्यात सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे दिसून आलेली नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp