Raj-Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: 'भांडण मिटवून टाकलं...', उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी तयार!

रोहित गोळे

Shiv Sena UBT-MNS Alliance: मनसेसोबत युती करण्यासाठी आपण तयार आहोत. त्यासाठी किरकोळ भांडणं मिटवू असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात केलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आतापर्यंत सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत युती करण्यास, एकत्र येण्यास आता तयार झाले आहेत. ज्याबाबत त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे विधान केलं आहे. 

शिवसेना कामगार सेनेचा जो मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्याच मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी भांडणं मिटवून टाकली चला..  किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मीसुद्धा तयार आहे, मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आता थेट राज ठाकरेंच्या दिशेने दोन पावलं पुढे टाकली आहेत.

राज ठाकरेंसोबत युती करायला तयार, पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले  

'मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण, तुम्ही बाहेर गेल्यावर आणि बातम्या वाचल्यावर कळेल किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे ते. किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मीसुद्धा तयार आहे. मी सुद्धा सर्व मराठी माणसांना महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो आहे.'

'पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसेभाला सांगत होतो की, महाराष्ट्रातन गुजरातमध्ये कारभार,उद्योग घेऊन जातायत, तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडं बसलं नसतं.'  

हे वाचलं का?

    follow whatsapp