Udhhav Thackeray : ''ये जो, है जो, काय...सुपारी थूक तोंडातली'', ठाकरेंकडून शिंदेंची मिमिक्री
Uddhav Thackeray News : संजय तुम्ही नागाची उपमा दिली.हा नागाचा अपमान आहे, हे मांडूळ आहेत, मोदींसमोर वळवळणारे मांडूळ आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाकरेंनी शिंदेंची खिल्ली उडवली

आणि म्हणून मी कुतून नाही बोलत

आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे असं शेतकरी म्हणतोय.
Uddhav Thackeray On Eknath Shinde : विक्रांत चव्हाण, ठाणे : ठाण्यातल्या गडकरी रंगायतन सभागृहातील सभेतून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेना डिवचलं आहे.इतकंच नाही तर ठाकरेंनी शिंदेंची सभेत मिमिक्री देखील केली आहे. ''आणि म्हणून मी कुतून नाही बोलत, असं कुतून मला येत नाही, आपण सरळ बोलतो आणि म्हणून'' असे म्हणत ठाकरेंनी शिंदेंची खिल्ली उडवली आहे. तसेच ''ये जो है, मशाल जो है वो, धनुष्यबाण जो है वो असं नाही रे, बोलायचं तर सरळ बोल ना रे, पहिली सुपारी थूक तोंडातली. पोट साफ करायचं द्या त्यांना औषध, निवडणुकीत त्यांना देऊ या'', अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंची मिमिक्री केली आहे.(udhhav thackeray criticize eknath shinde devendra fadnavis mahayuti thane gadkari rangayatan sabha maharashtra politics)
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. ''नमक हराम टूची उत्सुकता आहे. नागांचा मी अपमान करू शकत नाही. हे मांडूळ आहेत. गांडूळ नाही. हे दुतोंडी मांडूळ आहे. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांडूळ आहे. हे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही. फोन आल्यावरच खराब होते. जसे असाल तसे या. फोन येताच पळतात. नशिब पँट घातलेली असते.'' अशी खिल्ली देखील ठाकरेंनी यावेळी उडवली आहे.
हे ही वाचा : Parambeer Singh : ''ठाकरे पवारांच्या घरी बैठका, फडणवीसांसह 'या' नेत्यांना अटक करण्याचा होता प्लॅन''
''मी ठाणेकरांचं कौतुक करायला आलोय. सर्व काही पळवलं. जोर जबरदस्ती आणि पैशाचं वाटप. तरीही सव्वापाच लाख ठाणेकर निष्ठेने आपल्या बाजूला राहिले. वैशाली ताई साधी कार्यकर्ती. समोर मिंध्याचं कार्ट. तरीही या साध्या शिवसैनिकाचा पराभव करायला विश्वगुरुंना आणलं. तरीही चार लाख मते मिळाली. हा आपला विजय आहे. प्रचंड पैसा ओतून मते मिळाली. तरीही विजय दिसत नाही म्हणून लांड्या लबाड्या केल्या'', अशी टीका देखील ठाकरेंनी शिंदेंवर केली.
आम्हाला भीक नको. आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे असं शेतकरी म्हणतोय. आमचा हक्क मारून टाकला जात आहे. कोपराला गूळ लावला जात आहे. गुजरातला प्रकल्प जात होते. तेव्हा मिंधे म्हणाले, काळजी करू नका मोदी मोठा प्रकल्प देणार आहे. कुठे आहे प्रकल्प? दिला? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.