Udayanraje : छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्यावर गप्प बसणारेही राज्यपालांएवढेच दोषी
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्व धर्म समभावाची शिकवणूक दिली. सर्व जाती धर्मांतल्या लोकांवर होणारा अन्याय, जुलमी राजवट यातून सुटका करण्यासाठी हा नारा त्यांनी दिला होता. त्यांच्या दरबारात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. लोकशाहीचा पाया खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. अशा शिवरायांचा अपमान करताना लाज वाटत नाही का? असा सवाल छत्रपती उदयनराजे यांनी रायगडावरून केला […]
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्व धर्म समभावाची शिकवणूक दिली. सर्व जाती धर्मांतल्या लोकांवर होणारा अन्याय, जुलमी राजवट यातून सुटका करण्यासाठी हा नारा त्यांनी दिला होता. त्यांच्या दरबारात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. लोकशाहीचा पाया खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. अशा शिवरायांचा अपमान करताना लाज वाटत नाही का? असा सवाल छत्रपती उदयनराजे यांनी रायगडावरून केला आहे. राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्याविरोधात आज त्यांनी रायगडावर जाऊन आपली भूमिका मांडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर जे गप्प बसले ते राज्यपालांएवढेच दोषी
छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्यानंतर जे गप्प बसले ते राज्यपालांएवढेच दोषी आहेत. जी चूक आहे ती चूक असते त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. प्रोटोकॉल वगैरे कारणं देता कामा नयेत. छत्रपती शिवरायांनी जर प्रोटोकॉल वगैरे कारणं दिली असती तर आज आपण गुलामगिरीत असतो असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचा विचार दिला
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचा विचार दिला, रूजवला. त्याच महान व्यक्तीची विटंबना चित्रपट, लिखाण आणि वक्तव्यांतून केली जाते आहे. अशा वेळी आपण शांत राहून चालणार नाही. आधी वक्तव्य करायचं आणि मग म्हणायचं की मी त्या अर्थाने बोललो नव्हतो याला काही अर्थ नाही. मुळात कुणालाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. रायगड किल्ल्यावर निर्धार शिवसन्मानाचा हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी उदयनराजेंनी हे वक्तव्य केलं.
सगळ्यांना एकत्र आणणारे शिवाजी महाराज होते
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी जो विचार दिला त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं. त्यानंतर त्यांनी स्वराज्याचा विचार केला. त्यामुळे आज आपण लोकशाहीत राहू शकतो आहे. याचा विसर कुणालाही पडता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रयतेसाठी वेचलं आज अशाच महाराजांचा अपमान होत असताना गप्प कसं बसून राहायचं?