Bhaskar Jadhav: उद्धव ठाकरे गंभीर आजारी असताना गद्दारांनी संधी साधली, त्यानंतर हेच लोक भाजपसोबत गेले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उद्धव ठाकरे हे जेव्हा आजारी पडले होते तेव्हा त्यांची काळजी घेऊन महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांनी घ्यायला हवी होती त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर हेच गद्दार लोक भाजप सोबत गेले. उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रिया या जिवावरच्या धोक्याच्या होत्या. उद्धव ठाकरेंना तेव्हा हा विश्वास द्यायला हवा होता की आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र त्याचवेळी गद्दारांनी संधी साधली. ही बाब महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली आहे असं म्हणत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर टीका केली.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना

१९ जून १९६६ ला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना साथ देणारे दत्ताजी साळवी, सुधीर जोशी, मनोहर जोशी यांच्यासारखे अनेक नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्यापर्यंत पोहचवत होते. शिवसेनेकडे तेव्हा सत्तेचं साधन नव्हतं तेव्हा फक्त विचार होते. मात्र आज आपल्यासोबत विचार तर आहेच पण विकासही आपल्यासोबत आहे. असा विकास आपल्याप्रमाणे इतर कुठलाही पक्ष करू शकला नाही असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनाही टोला

आम्हाला सत्ता हवी, आम्हाला खुर्ची हवी ते लोकांची जनतेची सेवा करण्यासाठी. एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात आले आणि त्यांनी काय सांगितलं? गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला मुंबईची सत्ता हवी असं त्यांनी सांगितलं. ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी आपल्या लोकांनी जे हौताम्य पत्करलं होतं. ही मुंबई आपल्याला त्यांनी मिळवून दिली. त्याच मुंबईवर फार फार वर्षांपासून काही लोकांचा डोळा आहे असं म्हणत भास्कर जाधव यांनी अमित शाह आणि भाजपला टोला लगावला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता हवी आहे. मात्र एक पक्ष जो मुंबई मागतो आहे तो त्यांच्या स्वार्थासाठी मागतो आहे. आज गटप्रमुखांना निर्धार करायचा आहे की आपल्याला शिवसेनेचाच भगवाच मुंबई महापालिकेवर फडकावायचा. परवा गणपतीचं विसर्जन झालं त्यावेळी गणरायाचं विसर्जन करताना भक्तिभाव होता. मात्र गणरायाचं विसर्जन सुसह्य झालं ते शिवसेनेमुळे हे कुणी विसरू नये असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

आज आपल्याला सगळ्यांना सरकारी रूग्णवाहिका दिसत असतील, सरकारी रक्तपेढ्या दिसत असतील त्या काळात जिथे सरकारी रूग्णवाहिका नव्हती जिथे रक्तपेढ्या नव्हत्या तेव्हा शिवसैनिकांनीच आपल्या अंगातलं रक्त दिलं आहे हे विसरता येणार नाही.

ADVERTISEMENT

१९९२-९३ ची दंगल झाली त्याचा उल्लेख सगळेच करतात. त्यावेळी मुंबई शिवसेनेने वाचवली. शिवसेना म्हणजे मराठी माणूस, मराठी माणसाची ओळख आणि त्याच्या बद्दल भाष्य करताना आपण काय म्हणतो? मराठी माणूस म्हणजे फक्त नोकरी करणारा. त्याचं हॉटेल नव्हतं, त्याचं दुकान नव्हतं त्याचा व्यापार नव्हता हे सगळं नसतानाही मराठी माणूस दंगलीच्या काळात घरी बसला नाही. त्याने दुकानं वाचवली, मुंबई हातातून जाऊ दिली नाही असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. मुंबईतला प्रत्येक माणूस हा आमचा आहे अशी भावना शिवसेनेने ठेवली. मराठी आणि हिंदुत्व हे आमचा आत्मा आहे. छत्रपती शिवरायांची शिकवण आम्हाला आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांची शिकवण आचरणात आणली असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT