उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात; १ ऑगस्टला काय होणार?

मुंबई तक

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदाराच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली. याच नोटीसला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार, खासदारांच्या गटाने नवी कार्यकारिणी निवडल्यानंतर थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदाराच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली. याच नोटीसला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार, खासदारांच्या गटाने नवी कार्यकारिणी निवडल्यानंतर थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंतची वेळ दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी केली.

शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांच्याकडे सुनावणी घेण्याची मागणी केली. याला वकील एन.के. कौल यांनी विरोध केला. निवडणूक आयोगाने फक्त नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयात विधानसभा उपाध्यक्षांशी संबंधित प्रकरण असून, निवडणूक आयोगाकडील प्रकरण हे पक्षातंर्गत आहे, असं ते म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp