महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणारे तानाजी सावंत कोण आहेत? त्यांना इतका राग का येतो?
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, प्राध्यापक, साखर कारखानदार, शिक्षण संस्थाचालक ते आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत. तानाजी सावंत हे नाव मागच्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चिलं जातंय. कधी महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणं तर कधी खेकड्याने धरण फोडल्याच वक्तव्य. हे दोन्ही विधानं चांगलेच गाजले होते. हे कमी होतं का तर बंडखोरी केल्यापासून तानाजी सावंत या ना त्या कारणामुळे चर्चेत आहेत. […]
ADVERTISEMENT

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, प्राध्यापक, साखर कारखानदार, शिक्षण संस्थाचालक ते आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत. तानाजी सावंत हे नाव मागच्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चिलं जातंय. कधी महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणं तर कधी खेकड्याने धरण फोडल्याच वक्तव्य. हे दोन्ही विधानं चांगलेच गाजले होते. हे कमी होतं का तर बंडखोरी केल्यापासून तानाजी सावंत या ना त्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्याचं खापर मात्र त्यांनी मीडियावर फोडलं आहे. याच सगळ्या विषयावर आपण प्रकाश टाकूया.
तानाजी सावंत को गुस्सा क्यूँ आता है? असाच प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, नंतर प्राध्यापक, साखर कारखानदार, शिक्षण संस्थाचालक असलेले तानाजी सावंत सुरुवातीला सामूहिक विवाह सोहळ्यातून समोर आले. दरवर्षी ते मोठ्या संख्येत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन परंड्यात करायचे. दरम्यान त्यांनी राजकारणात एंट्री केली ती राष्ट्रवादी पक्षात. नंतर शिवसेनेत गेले. तिथे मातोश्रीच्या जवळ जाऊन पहिल्यांदा विधान परिषदेचं आमदार आणि नंतर युतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद पटकावलं.
यादरम्यान त्यांनी शिवसेनेत आपलं जम चांगलंच बसवलं होतं. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले सावंत उस्मानाबाद जिल्ह्यात रमू लागले. त्यांना उस्मानाबाद जिल्ह्याची धुरा देखील देण्यात आली. यादरम्यान उस्मानाबाद शिवसेनेत त्यांनी दबदबा निर्माण केला. ते म्हणतील ती पूर्वदिशा होऊ लागली. मातोश्रीचे जवळचे ते मानले जाऊ लागले. त्यातच पहिलं वादग्रस्त विधान आलं की, महाराष्ट्राला भिकारी बनवेन.
‘मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही’