IPL : उत्तम कामगिरीनंतरही टीम ओनर्सनी दाखवला बाहेरचा रस्ता

मुंबई तक

आयपीएलने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं आहे. आयपीएल म्हटलं की पैसा, मनोरंजन आणि रात्रीपर्यंत चालणाऱ्या सामन्यांचा थरार असं चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होतं. अनेक खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी करुन भारतीय संघात आपलं स्थान निश्चीत करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडू हे आयपीएलमध्ये आश्वासक कामगिरी करुन पुढे आलेले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आयपीएलने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं आहे. आयपीएल म्हटलं की पैसा, मनोरंजन आणि रात्रीपर्यंत चालणाऱ्या सामन्यांचा थरार असं चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होतं. अनेक खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी करुन भारतीय संघात आपलं स्थान निश्चीत करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडू हे आयपीएलमध्ये आश्वासक कामगिरी करुन पुढे आलेले आहेत.

अनेकदा प्लेअर्सना चांगली कामगिरी केल्यानंतरही संघातलं स्थान गमवावं लागलंत. आज आपण अशा ५ खेळाडूंची नावं जाणून घेणार आहोत.

५) युवराज सिंह (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – २०१८)

२००७ टी-२० आणि २०११ विश्वचषक विजयाचा हिरो अशी ओळख असलेला युवराज सिंह दुर्दैवाने आयपीएलमध्ये कधीच कोणत्याही एका संघात स्थिरावू शकला नाही. ११ वर्षांच्या कारकिर्दीत युवराज किंग्ज इलेव्हन पंजाब, पुणे वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनराईजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अशा संघाकडून खेळला आहे. २०१४ साली RCB ने युवराजवर १४ कोटींची बोली लावली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp