IND vs ENG :दिग्गज फेल, मधल्या फळीनं सावरलं; 15 वर्षानंतर मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगलं

मुंबई तक

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडने चौथ्या डावात 378 विक्रमी धावांचा पाठलाग करत विजय नोंदवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. तब्बल 15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले आहे. इंग्लंडने 378 धावांचा पाठलाग करताना जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अप्रतिम […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडने चौथ्या डावात 378 विक्रमी धावांचा पाठलाग करत विजय नोंदवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. तब्बल 15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले आहे.

इंग्लंडने 378 धावांचा पाठलाग करताना जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अप्रतिम खेळी खेळली. दोघांनी जबरदस्त शतक झळकावले आणि शेवटच्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या 7 विकेट्समध्ये टीम इंडियाला एकही यश मिळू दिले नाही. जो रूटने 142 आणि जॉनी बेअरस्टोने 114 धावा केल्या.

दोन्ही धडाकेबाज खेळींच्या जोरावर इंग्लंडने केवळ 77 षटकांत 378 धावांचे लक्ष्य गाठले. भारताने प्रतिस्पर्धी संघाला 350 हून अधिक धावांचे लक्ष्य देण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्यानंतरही हा सामना भारताने गमावला आहे.

जॉनी बेअरस्टोने टीम इंडियाची लय बिघडवली

हे वाचलं का?

    follow whatsapp