आश्विनच्या जाळ्यात अडकले इंग्लंडचे प्लेअर्स, भारताची सामन्यावर पकड
नवीन वर्षात पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडकडुन दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. चेन्नईच्या मैदानावर दुसरी टेस्ट खेळताना इंग्लंडला विजयासाठी भारताने ४८२ रन्सचं टार्गेट दिलं. या टार्गेटचा सामना करताना इंग्लंडच्या संघाची दिवसाअखेरीस ३ बाद ५३ अशी अवस्था झाली. चेन्नईचं पिच स्पिनर्सना चांगलीच मदत करतंय. अशा परिस्थितीत इंग्लंडचा संघ चौथ्या दिवशी कितपत […]
ADVERTISEMENT

नवीन वर्षात पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडकडुन दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. चेन्नईच्या मैदानावर दुसरी टेस्ट खेळताना इंग्लंडला विजयासाठी भारताने ४८२ रन्सचं टार्गेट दिलं. या टार्गेटचा सामना करताना इंग्लंडच्या संघाची दिवसाअखेरीस ३ बाद ५३ अशी अवस्था झाली. चेन्नईचं पिच स्पिनर्सना चांगलीच मदत करतंय. अशा परिस्थितीत इंग्लंडचा संघ चौथ्या दिवशी कितपत तग धरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – होम ग्राऊंडवर आश्विन चमकला, कपिल देवनाही टाकलं मागे
भारतीय संघाकडून तिसऱ्या दिवसाचा हिरो ठरला तो स्पिनर रविचंद्रन आश्विन. पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट घेतलेल्या आश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये कॅप्टन विराट कोहलीसोबत महत्वपूर्ण पार्टनरशीप केली. इतकच नव्हे तर विराट कोहली आऊट झाल्यानंतर आश्विनने अखेरच्या फळीतल्या बॅट्समनला सोबत घेऊन आपलं शतकही झळकावलं. तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या सेशनमध्ये भारतीय बॅट्समननी हाराकिरी केली. पण विराट कोहली आणि आश्विनने मोक्याच्या क्षणी संघाचा डाव सावरला.
अवश्य वाचा – Ind vs Eng : चेन्नईत फॅन्सकडून बायो बबल मोडण्याचा प्रयत्न