Ind vs Eng 5th test : पाचवा सामना रद्द; BCCI ने इंग्लंड बोर्डासमोर ठेवला नवा प्रस्ताव
भारतीय क्रिकेट संघाच्या स्टाफमधील महत्त्वाच्या व्यक्तींनाच कोरोनाची बाधा झाल्यानं पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कसोटी सामना रद्द करण्यात आल्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डासमोर नवीन प्रस्ताव ठेवला असून, रद्द करण्यात आलेला सामना भविष्यात खेळवण्याची विनंती केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने आघाडी घेतलेली असल्यानं सगळ्यांचं लक्ष पाचव्या सामन्याकडे लागलं […]
ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेट संघाच्या स्टाफमधील महत्त्वाच्या व्यक्तींनाच कोरोनाची बाधा झाल्यानं पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कसोटी सामना रद्द करण्यात आल्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डासमोर नवीन प्रस्ताव ठेवला असून, रद्द करण्यात आलेला सामना भविष्यात खेळवण्याची विनंती केली आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने आघाडी घेतलेली असल्यानं सगळ्यांचं लक्ष पाचव्या सामन्याकडे लागलं होतं. मात्र, पाचव्या सामन्याआधीच भारतीय क्रिकेट स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासह पाचजण कोरोना बाधित झाल्यानं पाचवा आणि मालिकेतील महत्त्वाचा सामना रद्द करावा लागला.
गुरूवारी सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्टस निगेटिव्ह आल्यानं पाचवा सामना खेळल्या जाण्याच्या आशआ पल्लवित झाल्या होत्या. मात्र, सामना सुरू होण्यास काही तासांचाच अवधी बाकी असताना इंग्लंड क्रिकेट बोर्ड व बीसीसीआयने चर्चा करून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर मालिकेच्या निकालाबद्दल चर्चा सुरू झाली. कारण भारतीय संघ पाचवा सामना खेळण्यास समर्थ नव्हता आणि त्यामुळेच हा सामना रद्द करण्यात आला. या परिस्थितीत इंग्लंडला वॉकओव्हर दिला जाऊ शकतो, याचाच अर्थ इंग्लंडचा संघ हा सामना जिंकला, असं जाहीर केलं शकतं.