IPL 2021 : नवीन हंगामाला उरले अवघे काही दिवस, जाणून घ्या काय आहेत प्रत्येक संघासमोरची आव्हानं?

मुंबई तक

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित हंगामाला युएईत सुरुवात होणार आहे. पहिला हंगाम कोरोनामुळे स्थगित करावा लागल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगामाचं आयोजन युएईत केलं आहे. या स्पर्धेनंतर युएईतच टी-२० विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे आयपीएलचा उर्वरित हंगाम हा प्रत्येक संघासाठी महत्वाचा आहे. कोरोनाचं सावट असल्यामुळे संघांसाठीही आयपीएलचा हा उर्वरित हंगाम सोपा नसेल. या हंगामाचं विजेतेपद मिळवण्यासाठी सर्वांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित हंगामाला युएईत सुरुवात होणार आहे. पहिला हंगाम कोरोनामुळे स्थगित करावा लागल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगामाचं आयोजन युएईत केलं आहे. या स्पर्धेनंतर युएईतच टी-२० विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे आयपीएलचा उर्वरित हंगाम हा प्रत्येक संघासाठी महत्वाचा आहे.

कोरोनाचं सावट असल्यामुळे संघांसाठीही आयपीएलचा हा उर्वरित हंगाम सोपा नसेल. या हंगामाचं विजेतेपद मिळवण्यासाठी सर्वांना नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला काही महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. थोडक्यात जाणून घेऊयात काय आहेत ही आव्हानं?

१) मुंबई इंडियन्स – (बुमराहचा वर्कलोड फॅक्टर)

जसप्रीत बुमराह हा जसा भारतीय संघासाठी महत्वाचा बॉलर आहे तसाच तो मुंबई इंडियन्ससाठीही महत्वाचा आहे. नुकतंच इंग्लंड दौऱ्यात बुमराहने आश्वासक गोलंदाजी केली. परंतू यानंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीही बुमराह भारतासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे बुमराहला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही आणि त्याच्यावर ताण येणार नाही याची काळजी मुंबई इंडियन्सला घ्यावी लागणार आहे.

२) चेन्नई सुपरकिंग्ज – (धोनी-जाडेजा जोडी फॉर्मात येणं गरजेचं)

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात चेन्नईने दमदार कामगिरी केली आहे. प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नईला आता अवघ्या काही विजयांची गरज आहे. परंतू पहिला हंगाम भारतात खेळल्यानंतर दुसरा हंगाम युएईत खेळत असताना चेन्नईच्या गोलंदाजांना स्वतःला पुन्हा एकदा खेळपट्टीशी जुळवून घ्यावं लागणार आहे. कर्णधार म्हणून धोनी आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जाडेजाचं फॉर्मात असणं चेन्नईसाठी महत्वाचं आहे.

३) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (विराटची सत्वपरीक्षा)

चेन्नईप्रमाणेच बंगळुरुच्या संघानेही या पर्वात चांगली कामगिरी करत स्वतःचं आव्हान कायम राखलं आहे. परंतू हा हंगाम कर्णधार विराट कोहलीसाठी सत्वपरीक्षा असणार आहे. अद्यापही RCB ला विजेतेपद न मिळणं, ICC स्पर्धांमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारताला विजेतेपद न मिळणं या सर्व पार्श्वभूमीवर विराटला आयपीएलच्या या हंगामात स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. विराट यंदा RCB ला विजेतेपद मिळवून देऊ शकला तर टी-२० विश्वचषकाकरता भारतीय संघासाठी ही महत्वाची गोष्ट ठरेल.

१७ ऑक्टोबरला IPL च्या दोन संघांचा लिलाव रंगण्याचे संकेत

४) दिल्ली कॅपिटल्स – (आश्विनकडे असेल सर्वांचं लक्ष)

४ वर्षांनी भारताच्या टी-२० संघात पदार्पण केलेल्या आश्विनला यंदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम ११ मध्ये स्थान मिळवायचं असेल तर आयपीएल हा उत्तम पर्याय आहे. दिल्लीकडून आश्विनने आतापर्यंत अनेकदा सुरुवातीला गोलंदाजी केली आहे. उर्वरित हंगामात जर आश्विन दिल्लीसाठी उत्तम कामगिरी करु शकला तर टी-२० विश्वचषकासाठी ही चांगली बाब ठरु शकते.

५) कोलकाता नाईट रायडर्स – (वरुण चक्रवर्तीची कामगिरी)

भारतात पार पडलेल्या पहिल्या हंगामात कोलकात्याकडून वरुणने आश्वासक खेळ केला. या कामगिरीच्या जोरावर त्याला भारताच्या श्रीलंका दौऱ्यात आणि आता विश्वचषक संघातही जागा मिळाली. युएईतल्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंची कामगिरी पाहता वरुण चक्रवर्ती कशी कामगिरी करतो यावर कोलकाता नाईट रायडर्सचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

६) राजस्थान रॉयल्स – (संजू सॅमसनवर असेल भिस्त)

राजस्थानने नवीन हंगामात कॅप्टन्सीमध्ये बदल करत संजू सॅमसनला कर्णधारपद दिलं. यानंतरही संघाच्या कामगिरीत फरक पडलेला दिसला नाही. त्यामुळे या हंगामात जर संघाला बाद फेरी गाठायची असेल तर संजू सॅमसनला फॉर्मात येऊन आपल्या लौकिकाला साजेशी आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे.

७) पंजाब किंग्स – (मोहम्मद शमीचा वर्कलोड)

मुंबई इंडियन्सप्रमाणे पंजाब किंग्ज संघालाही मोहम्मद शमीचा वर्कलोड सांभाळावा लागणार आहे. इंग्लंड दौऱ्यात शमीला एका सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. आगामी टी-२० विश्वचषकासाठी शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. याआधी शमीची दुखापतीचा इतिहास पाहता शमीचा जपून वापर करणं पंजाबसाठी महत्वाचं आहे.

८) सनराईजर्स हैदराबाद – (भुवनेश्वर कुमारचा जपून वापर)

सनराईजर्स हैदराबादचं या स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं असलं तरीही उर्वरित सामन्यांमध्ये हा संघ अनेकांची गणित बिघडवू शकतो. केन विल्यमसनकडे संघाचं कर्णधारपद असल्यामुळे भुवनेश्वरचा वापर तो कसा करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp