IPL 2022, CSK: …तर जग संपणार नाहीये, महेंद्रसिंह धोनी असं का म्हणाला?

मुंबई तक

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखून ठेवलं आहे. रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने 91 धावांनी दिल्लीवर मात केली. यंदाच्या हंगामात चेन्नईला प्ले-ऑफची जागा गाठायची असेल तर बरीच मेहनत करावी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांत चेन्नईने फक्त 4 सामन्यांत विजय मिळवले आहेत. अशा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखून ठेवलं आहे. रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने 91 धावांनी दिल्लीवर मात केली.

यंदाच्या हंगामात चेन्नईला प्ले-ऑफची जागा गाठायची असेल तर बरीच मेहनत करावी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांत चेन्नईने फक्त 4 सामन्यांत विजय मिळवले आहेत. अशा परिस्थितीत महेंद्रसिंह धोनीने संघाच्या प्ले-ऑफ मधल्या स्थानाबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.

खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराटला गावसकरांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…ब्रेक घेऊ नकोस !

दिल्लीविरुद्ध सामना झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला प्ले-ऑफच्या स्थानाबद्दल विचारलं असता त्याने, जर आम्ही प्ले-ऑफला पात्र झालो तर चांगलंच आहे, पण समजा आम्हाला हे जमलं नाही तर जगाचा अंत होणार नाहीये असं उत्तर दिलं. आतापर्यंत झालेल्या सामन्यात 4 विजय आणि 7 पराभवांमुळे दिल्लीला प्ले-ऑफचं स्थान गाठण्यासाठी उर्वरित सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे यापुढील सर्व सामन्यात चेन्नईला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp