Tokyo Olympics 2020: ‘तुम्ही जबरदस्त काम केलंय, संपूर्ण देश नाचतोय’, PM Modi यांचा थेट भारतीय हॉकी टीमला फोन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवून तब्बल 41 वर्षानंतर पदकाची कमाई केली आहे. हॉकीत मिळालेलं हे यश नक्कीच अभूतपूर्व असं आहे. सुमारे 41 वर्ष भारत ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत होता. अखेर टोकियोत त्यांना हे यश मिळालंच. त्यांचं हे यश आज अवघा देश साजरं करत आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयी संघाला स्वत: फोन करुन त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांचं प्रचंड कौतुक केलं.

कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय संघाने जो चित्तथरारक विजय मिळवला त्यामुळे देशात एकच जल्लोष साजरा केला जात आहे. हाच जल्लोष भारतीय संघापर्यंत पोहचवावा आणि खेळाडूंचं कौतुक करावं या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचा कॅप्टन मनप्रीत सिंग, मुख्य कोच ग्राहम रिड आणि सहाय्यक कोच पियुष दुबे यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. ज्याचा व्हीडिओच आता समोर आला आहे.

पाहा पंतप्रधान मोदी फोनवरुन नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘तुम्ही जबरदस्त काम केलंय, संपूर्ण देश नाचतो आहे. तुमच्या लोकांची मेहनत कामी आली आहे. पियुषजींनी देखील खूप मेहनत केली. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य आहे. आपण 15 ऑगस्टला भेटणार आहोत मी तुम्हा सर्वांना बोलावलं आहे. पियुषजी आहेत का तिथे?’

‘पियुषजी खूप-खूप शुभेच्छा… संपूर्ण देशाला तुमचा गौरव वाटत आहे.’

ADVERTISEMENT

‘ग्रॅहम जी.. अभिनंदन.. तुम्ही इतिहास घडवला आहेत. माझ्या तुम्हाला खूप शुभेच्छा.. तुम्ही जी कठोर मेहनत केली त्याचं हे यश आहे. त्यातूनच हे यश आपल्याला पाहायला मिळतं आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय. धन्यवाद.’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये बेल्जियमविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. ज्यानंतर संघाचा आत्मविश्वास काहीसा खालावला होता. पण तेव्हा देखील पंतप्रधान मोदी यांनी संघाशी फोनवरुन चर्चा केली होती आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला होता. त्याचविषयी आज हॉकी संघाचा कर्णधार आणि कोच यांनी आभार मानले.

Tokyo Olympics 2020: एक असा विजय जो पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील!

२०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने कांस्यपदाच्या सामन्यात जर्मनीवर ५-४ अशी मात करत पदकावर आपलं नाव कोरलं आहे. तब्बल ४१ वर्षांच्या फरकाने भारताने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली. १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीत शेवटचं पदक जिंकलं होतं.

यानंतर भारतीय संघाला एकदाही पदकाची कमाई करता आली नाही. परंतू टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रदीर्घ कालावधीची प्रतीक्षा संपवत भारतीय हॉकी संघाने पदकावर नाव कोरत, भारतीय हॉकीचे जुने दिवस पुन्हा एकदा आणले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT